मुंबई : ज्ञानव्यापी मशिदीचा मुद्दा सध्या देशात 2024 च्या निवडणुकीसाठी उकरून काढला जात आहे. देशात विकासाच्या विकासाच्या मुद्दयावरून निवडणुका लढवायला पाहिजे. ताजमहाल, जामा मशिद हे विषय सध्या चर्चेत आणले जात असून महागाईवर कोणी बोलत नसल्याचाही त्यांनी सांगितलं. तसेच संजय राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.
“महिलांवर हात उगाराल तर हात तोडून हातात देऊ”; सुप्रिया सुळे संतापल्या
ज्ञानव्यापी मशिदीवरून देशात राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, सध्या देशात 2024 ची तयारी सुरू आहे. प्रत्येक धार्मिक आणि ऐतिहासिक गोष्टीचं उत्खनन करून मुद्दा गाजवायचा. काशी, मथुरा हा विषय हिंदुत्वाचा आहे. त्याचा आम्हालाही देखील अभिमान आहे. मात्र हे विषय पुन्हा उकरून देशात दंगली पेटवायच्या, हे दोन्ही बाजूंनी टाळावे लागेल.
“OBC आरक्षणासाठी केंद्राचा कोणताही संबंध नाही, फक्त प्रस्थापितांच्या आघाडीला देण्याची इच्छा नाही”
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौराबाबत त्यांनी भाष्य करताना म्हणाले की, एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत जायला निघाले. बृृजभूषण सिंह यांना मी गेल्या काही वर्षापासून ओळखतो. तो लढवय्या माणूस असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचा अयोध्या दौरा हा काही राजकीय दौरा नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेनेचा अयोध्या दौरा अगोदर 10 जून रोजी नियोजित होता. मात्र राज्यसभेच्या निवडणुकांचा कारण देत तो दौरा आता 15 जून रोजी होणार असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं आहे.
ताईंनी लेन्स बदलून आघाडीत आल्या तर बंर होईल; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना खुली ऑफर
दरम्यान, मनसेची पुर्वी उत्तर भारतीय तसेच मराठी भाषा विषयी भूमिका होती. ती आता राज ठाकरे यांनी का सोडली माहिती नाही? उत्तर प्रदेशमध्ये ते जात आहेत. काही लोकांच्या भावना होत्या. त्यांचा उद्रेक झाला असेल. त्यामुळे राज ठाकरे यांना ते लोक अयोध्येत येऊ देत नसेल. तसेच संभाजी राजे जर शिवसेनेत आले तर त्यांचा नक्की आम्ही विचार करू, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
Read also:
- “पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला
- “महापालिकेच्या कुठल्याही वार्डात निवडणुक लढवून दाखवावी”; चित्रा वाघ यांना विद्या चव्हाण यांचं खुलं आव्हान
- “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले, भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले”
- राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना
- गळ्याला कोरडं पडलं अन् सोलापुरचा पाणी बारामतीला; पालकमंत्र्यांच्या फोटोला कुंकवाचा अभिषेक घालत आपचा जाहीर निषेध