मुंबई : ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून मध्य प्रदेश सरकारला आता निवडणुकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी यावर भाष्य केलं आहे.
“इतिहास नोंद ठेवेल, बाळासाहेबांच्या पोराने औंरग्याच्या कबरीला संरक्षण पुरवलं”
आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मध्यप्रदेशमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हे पुन्हा स्पष्ट झालं आहे की, ओबीसी आरक्षणाला केंद्र सरकारचा कोणताही संंबंध नाही. फक्त प्रस्थापितांच्या महाआघाडीला ते देण्याची इच्छाशक्ती असली पाहिजे. असा घणाघात गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
काॅंग्रेसला पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठा धक्का! हार्दिक पटेलने दिला राजीनामा
ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत जे मध्यप्रदेश सरकारला जमलं ते महाराष्ट्र सरकारला जमलं नाही. आज मध्यप्रदेशात ओबीसींना त्यांचे हक्क मिळाले आहेत. आपल्या राज्यातील ओबीसी बांधव मात्र महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहिले याची खंत वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाला मान्यता दिली आहे. मग महाराष्ट्राला हा न्याय लागू का होत नाही. मध्यप्रदेशला मागच्या आठवड्यात दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने देशभराला लागू केला होता. तसाच आता हा देखिल निर्णय संपूर्ण देशाला लागू करा, अशी मागणी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
संभाजी राजेंचं आमदारांना खुल पत्र; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर”..;
दरम्यान, राज्यात आगामी काही काळात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900, ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य निवडणुक आयोग इतक्या साऱ्या निवडणुका एका टप्प्या न घेता त्या 2 किंवा 3 टप्प्यात घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी किमान 6 आठवडे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ऐनपावसाळ्यात सगळेच लोक आपल्या कामात व्यस्त असतात. तसेच अनेक राज्य कर्मचारीही देखील कामात व्यस्त असतात. त्यामुळे मतदानाचा टक्का देखील घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका सप्टेंबर अखेरीस जाण्याची शक्यता आहे.
Read also:
- ताईंनी लेन्स बदलून आघाडीत आल्या तर बंर होईल; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंना खुली ऑफर
- “महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार”, भुजबळांनी व्यक्त केला विश्वास
- राऊत- सोमय्या वाद चिघळला; किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांची याचिका कोर्टात दाखल..
- OBC आरक्षणाला झारीतल्या शुक्राचार्यांचा विरोध; बावनकुळेंचा शरद पवारांवर निशाणा
- ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मध्यप्रदेश सरकारलाही दिला हिरवा कंदील