मुंबई : ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून मध्य प्रदेश सरकारला आता निवडणुकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याच पार्श्वभुमीवर भाजप नेते चंद्रशेखर वाबनकुळे यांनी भाष्य केलं आहे.
शरद पवारांच्या समंतीने राज्यात पुरस्कृत दहशतवाद; भाजपचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
ओबीसी समाजावर अन्याय करणाऱ्या राज्य सरकारला आम्ही सोडणार नाही. मध्य प्रदेश सरकार जे करू शकलं ते महाराष्ट्र सरकार करू शकलं नाही, जाणीवपुर्वक ओबीसीचा विश्वासघात सरकारने केला. राज्य सरकारने मुद्दाम ट्रिपल टेस्ट केली नाही. ओबीसी समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. झारीतले शुक्राचार्य यात सहभागी आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
“दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून नये”; रोहित पवारांचा सल्ला
ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत जे मध्यप्रदेश सरकारला जमलं ते महाराष्ट्र सरकारला जमलं नाही. आज मध्यप्रदेशात ओबीसींना त्यांचे हक्क मिळाले आहेत. आपल्या राज्यातील ओबीसी बांधव मात्र महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहिले याची खंत वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाला मान्यता दिली आहे. मग महाराष्ट्राला हा न्याय लागू का होत नाही. मध्यप्रदेशला मागच्या आठवड्यात दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने देशभराला लागू केला होता. तसाच आता हा देखिल निर्णय संपूर्ण देशाला लागू करा, अशी मागणी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ममता दीदींच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊलं; केंद्र सरकारच्या विरूद्ध धडक कृती मोहीम
दरम्यान, राज्यात आगामी काही काळात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900, ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य निवडणुक आयोग इतक्या साऱ्या निवडणुका एका टप्प्या न घेता त्या 2 किंवा 3 टप्प्यात घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी किमान 6 आठवडे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ऐनपावसाळ्यात सगळेच लोक आपल्या कामात व्यस्त असतात. तसेच अनेक राज्य कर्मचारीही देखील कामात व्यस्त असतात. त्यामुळे मतदानाचा टक्का देखील घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका सप्टेंबर अखेरीस जाण्याची शक्यता आहे.
Read also:
- ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मध्यप्रदेश सरकारलाही दिला हिरवा कंदील
- “इतिहास नोंद ठेवेल, बाळासाहेबांच्या पोराने औंरग्याच्या कबरीला संरक्षण पुरवलं”
- काॅंग्रेसला पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठा धक्का! हार्दिक पटेलने दिला राजीनामा
- संभाजी राजेंचं आमदारांना खुल पत्र; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर”..;
- “अंडी फेकण्याची संस्कृती शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की..”; चंद्रकांत पाटलांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर