मुंबई : ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मध्य प्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून मध्य प्रदेश सरकारला आता निवडणुकांसाठी मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत.
“दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवून नये”; रोहित पवारांचा सल्ला
महाराष्ट्रात देखील ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुका रखडल्या होत्या. त्यावर न्यायालयात अनेक वेळा युक्तीवाद कऱण्यात आला. मात्र त्यावर तोडगा काही काढू शकले नाहीत. काल झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने ज्या ठिकाणी पाऊस नसणार, त्याठिकाणी निवडणुका घेण्यास काही हरकर नाही. असं म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काही काळात निवडणुका लवकर होणार का? ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
ममता दीदींच्या पावलावर ठाकरे सरकारचे पाऊलं; केंद्र सरकारच्या विरूद्ध धडक कृती मोहीम
मध्यप्रदेशला सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाला मान्यता दिली आहे. मग महाराष्ट्राला हा न्याय लागू का होत नाही. मध्यप्रदेशला मागच्या आठवड्यात दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने देशभराला लागू केला होता. तसाच आता हा देखिल निर्णय संपूर्ण देशाला लागू करा, अशी मागणी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दोन आठवड्यापुर्वी म्हणजे 4 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवडणुक प्रक्रिया जाहीर कऱण्याचे आदेश राज्य निवडणुक आयोगाला दिले होते. त्यामुळे निवडणुका ऐन पावसाळ्यात होणार का? त्याकडे कुतुहल निर्माण झालं होतं.
“महागाईमुळे सध्या आमच्या घरात लिंबू सरबत बनतच नाही”; सुप्रिया सुळे
दरम्यान, राज्यात आगामी काही काळात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900, ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य निवडणुक आयोग इतक्या साऱ्या निवडणुका एका टप्प्या न घेता त्या 2 किंवा 3 टप्प्यात घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी किमान 6 आठवडे लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ऐनपावसाळ्यात सगळेच लोक आपल्या कामात व्यस्त असतात. तसेच अनेक राज्य कर्मचारीही देखील कामात व्यस्त असतात. त्यामुळे मतदानाचा टक्का देखील घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुका सप्टेंबर अखेरीस जाण्याची शक्यता आहे.
Read also:
- “इतिहास नोंद ठेवेल, बाळासाहेबांच्या पोराने औंरग्याच्या कबरीला संरक्षण पुरवलं”
- काॅंग्रेसला पुन्हा एकदा गुजरातमध्ये मोठा धक्का! हार्दिक पटेलने दिला राजीनामा
- संभाजी राजेंचं आमदारांना खुल पत्र; म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, आंबेडकर”..;
- “अंडी फेकण्याची संस्कृती शरद पवारांनीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की..”; चंद्रकांत पाटलांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
- शरद पवारांच्या समंतीने राज्यात पुरस्कृत दहशतवाद; भाजपचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप