नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस अॅक्शन मोडवर आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज देशातल्या सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची महत्वपुर्ण बैठक होत आहे. विधिमंडळ पक्षनेतेही बैठकीत सहभागी होणार असून राज्यातून बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, नाना पटोले दिल्लीत दाखल झाले आहेत. या बैठकीत लोकसभा जागावाटपाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…“हाड हाड ला खरोखरचं उपरती झालीय का?” चित्रा वाघ यांची आव्हाडांवर जहरी टिका
महाराष्ट्रात भाजपचा पराभव करण्याची शक्ती असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी मिळणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात काॅंग्रेस ताकदीने लढणार आहे तर काॅंग्रेस परंपरागत जागांवर दावा करणार आहे. मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी राज्यातील काॅंग्रेस जागांसंदर्भात एक ते दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आजच्या बैठकीत राज्यातील काॅंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचा लेखाजोखा राष्ट्रीय अध्यक्षांसमोर मांडला.
हेही वाचा..“राजू शेट्टींना विरोध, उद्धव ठाकरेंनी १५ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता”
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात जागा वाटपासंदर्भात आज प्राथमिक चर्चा झाली आहे. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी प्राथमिक माहिती खर्गे यांच्यासमोर ठेवली. यानुसार काॅंग्रेस पक्षाला किती जागा हव्यात याची माहिती थोरात आणि पटोले यांनी खर्गे यांना दिली असल्याची माहिती समोर आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…देशात आणखी एक राजकीय भूकंप, मुख्यमंत्र्यांच्या बहिणीचा पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या प्रयत्नात
हेही वाचा..“शरद पवार, सुप्रिया सुळेंवर टिका झाली तर आक्रमक व्हा”, एकनाथ खडसेंनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश
हेही वाचा…“षडयंत्र करून कुणबीच्या नावाने खोटे ओबीसी घुसवणार का ?” मंत्री छगन भुजबळांचा सवाल
हेही वाचामावळात महायुतीत मिठाचा खडा, पार्थ पवारांसाठी २ आमदारांची टाईट फिल्डिंग, अजित पवार काय निर्णय घेणार ?
हेही वाचा…अब्दूल सत्तारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, ‘त्या’ प्रकरणावरून एकनाथ शिंदे सत्तारांना झाप झाप झापणार?