मुंबई : ओबीसींमधील तेली, माळी, साळी या सर्व जातींना बाहेर काढण्याचे षडयंत्र केले जात असून कुणबीच्या नावाने खोटे ओबीसी घुसवणार का? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा उपस्थित केला. तसेच मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागला पाहिजे नाही, असेही भुजबळ म्हणाले. संगमनेर येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सकल समाजाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन भुजबळांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, भाजप आमदाराची मागणी, भाजपा आक्रमक
देशात ५४ टक्के ओबीसी मागासवर्गीय असून सोबत या देशातील आदिवासी समाज आहे. अस्तित्वासाठी लढून जशास तसं उत्तर देऊ.आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. या लढाईत सर्वांनी एकजूट दाखवूया, असे आवाहनही भुजबळांनी ओबीसी बांधवांना केले. मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या मागासलेपणाच्या सर्वेक्षण १५ दिवसांत होणार असेल तर आणखी दोन महिने घ्या आणि सर्व जातींची जनगणना करुन टाका. जातीनिहाय जनगणना केलीच पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी पुन्हा व्यक्त केली.
हेही वाचा…“डोळे मिटून दुध पितंय कोण? मिंधे-भाजप बोके दोन”, ठाकरे गटाची सरकारवर मोठी टिका
दरम्यान, नायगावमध्ये झालेल्या प्रकरणावरूनही भुजबळांनी संताप व्यक्त केला. नायगावमध्ये आम्ही सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर दुग्धाभिषेकाने पुतळ्यांचे शुध्दीकरण करून स्पृश्य अस्पृश्य भेदभाव करणाऱ्यांना महात्मा फुले यांचे विचारच समजले नाहीत. असंही ते म्हणाले. यावेळी संगमनेर परिसरातील सकल ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
READ ALSO :
हेही वाचामावळात महायुतीत मिठाचा खडा, पार्थ पवारांसाठी २ आमदारांची टाईट फिल्डिंग, अजित पवार काय निर्णय घेणार ?
हेही वाचा…अब्दूल सत्तारांच्या वक्तव्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल, ‘त्या’ प्रकरणावरून एकनाथ शिंदे सत्तारांना झाप झाप झापणार?
हेही वाचा…“हाड हाड ला खरोखरचं उपरती झालीय का?” चित्रा वाघ यांची आव्हाडांवर जहरी टिका
हेही वाचा..“राजू शेट्टींना विरोध, उद्धव ठाकरेंनी १५ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता”
हेही वाचा…“मटणाच्या पार्ट्या झोडणारे लोक आज आंदोलनात उतरलेत”, आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक, ठाकरे गटाने लगावला टोला