सिल्लोड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु तरूणांची इतकी मोठी गर्दी झाली की पोलिसांना लाठाचार्ज करण्याचा आदेश चक्क अब्दूल सत्तार यांनी पोलिसांना दिले. यावेळी अब्दूल सत्तार यांनी भरकार्यक्रमात शिवराळ भाषेत लोकांना झाप झाप झापलं. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला. विरोधी पक्षातील नेत्यांनी अब्दूल सत्तार यांच्यावर जोरदार टिका केली. तर झालेल्या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्राची महानंदा कोण विकत आहे?” इतिहास दाखवत राऊतांचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सवाल
अब्दूल सत्तार यांनी केलेल्या विधानाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याची प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. अब्दूल सत्तार यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे कॅबिनेटच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे अब्दूल सत्तार यांच्याशी संवाद साधणार आहेत. परंतु निश्चितच एक जबाबदार मंत्री, लोकप्रतिनिधी यांनी अशी वक्तव्ये करू नयेत या मताशी आम्ही सर्वजण आहोत. असं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…मंत्री आहे की गुंड ? लोकांना कुत्र्यासारखं मारा, सत्तारांचा पोलिसांना आदेश, गौतमी पाटलाच्या कार्यक्रमात मोठा राडा
दरम्यान, इतक्या जमावाने महिला, लहान लहान मुलं त्या कार्यक्रमाला येतात. त्या कार्यक्रमात आल्यानंतर सुरक्षित घरी जावं, यासाठी काही सुरक्षेच्या कारणास्तव ज्याचा मी वापर केला. त्यावेळेची परिस्थिती अतिशय गंभीर होती की , मी चुकीच्या पद्धतीने माझ्या तोंडून शब्द निघाले. अजून आमच्या तिथे सात दिवस कार्यक्रम आहे. हे सर्व कार्यक्रम सुरक्षित व्हावेत इतकीच आशा आहे. पंरतु केलेल्या व्यक्तव्याचा मी खेद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया अब्दूल सत्तार यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“हाड हाड ला खरोखरचं उपरती झालीय का?” चित्रा वाघ यांची आव्हाडांवर जहरी टिका
हेही वाचा..“राजू शेट्टींना विरोध, उद्धव ठाकरेंनी १५ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला दाखवला बाहेरचा रस्ता”
हेही वाचा…“मटणाच्या पार्ट्या झोडणारे लोक आज आंदोलनात उतरलेत”, आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक, ठाकरे गटाने लगावला टोला
हेही वाचा…जितेंद्र आव्हाडांना तात्काळ अटक करा, भाजप आमदाराची मागणी, भाजपा आक्रमक
हेही वाचा…“डोळे मिटून दुध पितंय कोण? मिंधे-भाजप बोके दोन”, ठाकरे गटाची सरकारवर मोठी टिका