मुंबई : राज्यातील अनेक नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आहे. त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विमानतळावरून एकनाथ शिंदे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. याठिकाणी त्यांच्यात चर्चा होणार असून ते थेट राजभवनात जाणार आहेत.
“लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही”; रूपाली चाकणकरांचं ट्विट व्हायरल
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांचा आजच शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली असून उरर्वित मंत्रिमंडळाचा शपथविधी लगेचच दुसऱ्या दिवशी होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
काय ती झाडी, काय तो डोंगार? एकदम ओके सरकार; अमोल मिटकरींचा खोचक टोला
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देणार? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं होतं. जवळपास 15 तासानंतर राज ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशीबालाच कर्तृत्व समजू लागतो. त्यादिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो. असं म्हणत राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे.
देवेंद्र फडणवीसांचं ‘असं’ असेल नवे मंत्रिमंडळ; नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
दरम्यान, एकनाथ शिंदे आज मुंबईत दाखल झाले असून त्यांच्यासाठी मोठी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. विमानतळावरून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यापर्यंत त्यांच्या ताफ्यात जवळपास 25 ते 30 गाड्यांचा ताफा आहे. कोणतीही अघटित घटना घडू नये म्हणून त्यांना केंद्र सरकारकडून झेड सुरक्षा पुरविण्यात आली आहे.
Read also
- 15 तासानंतर राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंबाबत ट्विट; म्हणाले की,”एखादा माणूस ज्यादिवशी..”;
- फडणवीस मंत्रीमंडळ : राहुल कुल की महेश लांडगे.. कुणाला मिळणार संधी?
- इडीचे अधिकारी आता कुलुप आणायला गेलेत; राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोल
- २५ हजार कोटींची फाईल्स असेल तर मंजूर कशी करणार? अजित पवार कॅबिनेट मंत्र्यांवरच संतापले
- ..त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल; रोहित पवारांचं सुचकं वक्तव्य