पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना रात्री बारा वाजता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. यातच राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कारवाई करण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई हायकोर्टानकडून रोहित पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा…सदावर्तेंकडून गोडसेचं उदात्तीकरण, “भाजपचा हात असल्याशिवाय अशी पिलावळ..,” वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टिका
येत्या ६ ऑक्टोंबरला बारामती अॅग्रोबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तोपर्यंत बारामती अॅग्रोबाबत कोणतीही कारवाई करू नका, असे आदेश मुंबई हाय कोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाला देण्यात आले आहेत. त्यामुळे रोहित पवारांना कोर्टाकडून तात्पुरता मोठा दिलासा मिळाला आहे. यातच आता ६ ऑक्टोबरच्या सुनावणीत मुंबई हायकोर्ट काय निर्णय घेणार ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“मलाही मुंबईत घर घेण्यास अडचण आली”, पंकजा मुंडेंनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी
बारामती अॅग्रो कंपनीचे सीईओ म्हणून रोहित पवार काम पाहत आहेत. तर रोहित पवारांचे वडिल या कंपनीचे संचालक आहेत. पशू खाद्य बारामती अॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट असून साखर उत्पादनही सुरू करण्यात आलं आहे. याच्या बारामती आणि छत्रपती संभाजीनगर या दोन ठिकाणी साखर कारखाने आहेत. दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायही बारामती अॅग्रोद्वारे केले जातात.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही?” भाजपचा कडवा सवाल
हेही वाचा…जगातील सर्वात पहिला छत्रपतींचा सोन्याचा ‘सुवर्ण मंदिर’, सर्वात मोठा ध्वज, सर्वात मोठा पुतळा,” शरद सोनवणेंनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…“सकाळी शाळा, अन् सांयकाळी शाळेच्याच मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स,” शिक्षणमंत्री केसरकर कारवाई करणार का ?
हेही वाचा…महाराष्ट्रातील लोकशाहीचा घात होत असताना नार्वेकर ‘घाना’ला का जात आहे ? ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“जगाला दाखवण्यासाठी गांधी आणि मनामध्ये गोडसे हे भाजपाचे ढोंग!” काॅंग्रेसची जोरदार टिका