मुंबई : शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही? याचं उत्तर शरद पवारांनी कधीच दिलं नाही. शरद पवार 1960 पासून मराठा आरक्षणाबद्दल आश्वासन देत आहेत आणि आता ते मराठा आरक्षण देण्यात अपयशी ठरले म्हणून ते जबाबदारी आमच्यावर टाकत आहेत. असं विधान भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. याचसोबत मुनगंटीवार यांनी शरद पवारांवर जोरदार टिका देखील केली आहे.
हेही वाचा…“मलाही मुंबईत घर घेण्यास अडचण आली”, पंकजा मुंडेंनी सांगितल्या ‘त्या’ आठवणी
महाराष्ट्रात काही राजकीय पक्षाचे नेते अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करत असतात. कारण त्यांना वाटते अस्थिरतेच्या पायऱ्यावरच त्यांची सत्ता निर्माण होऊ शकते. सध्याच्या स्थितीवर नजर ठेवून आहे. त्याला लगेच हे लक्षात येईल की सध्या अस्थिरता कोण निर्माण करत आहे ? राज्यात एवढे उपोषण होत असताना शरद पवार कधीच कुठल्याच उपोषणाला नाही गेले. धनगर समाजाच्या उपोषणाला का कधी शरद पवार गेले नाही. कारण त्यांना माहित आहे की या सगळ्या गोष्टीतून अस्थिरता निर्माण करण्यामध्येच आपल्याला संधी आहे. असंही सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
हेही वाचा…” छगन भुजबळ जेलमध्ये असताना शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यात विविध समाजाच्या आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि धनगर, आदिवासी आरक्षण सध्या राज्यात चर्चेत आले आहेत. आरक्षण मिळवण्यासाठी विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलन, उपोषणही सुरू आहे. त्यामुळे सध्या यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झालं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…जगातील सर्वात पहिला छत्रपतींचा सोन्याचा ‘सुवर्ण मंदिर’, सर्वात मोठा ध्वज, सर्वात मोठा पुतळा,” शरद सोनवणेंनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…“सकाळी शाळा, अन् सांयकाळी शाळेच्याच मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स,” शिक्षणमंत्री केसरकर कारवाई करणार का ?
हेही वाचा…महाराष्ट्रातील लोकशाहीचा घात होत असताना नार्वेकर ‘घाना’ला का जात आहे ? ठाकरेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“जगाला दाखवण्यासाठी गांधी आणि मनामध्ये गोडसे हे भाजपाचे ढोंग!” काॅंग्रेसची जोरदार टिका
हेही वाचा…सदावर्तेंकडून गोडसेचं उदात्तीकरण, “भाजपचा हात असल्याशिवाय अशी पिलावळ..,” वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टिका