मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांकडून ठाकरे सरकारची चांगलीच कोंडी करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे, आजच्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दिसून आले. आज, मागच्या वर्षीसारखी यावर्षीही भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक, ऑनलाईन पद्धतीनं झाली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे इतर प्रमुख नेते आणि चौदाशे कार्यकर्ते उपस्थित होते.
केवळ आणि केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले.
केंद्राकडे डेटाची मागणी ही ५० टक्क्यांच्या वरचे आरक्षण टिकविण्यासाठी. पण महाविकास आघाडी सरकारला ५० टक्क्याच्या खालचे आरक्षण टिकविता आले नाही: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) June 24, 2021
यावेळी, ओबीसी आरक्षणावर बोलताना त्यांनी, “हे आरक्षण केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. या सरकारने मागच्या १५ महिन्यांत मागासवर्गीय आयोगाची स्थापनाच केलेली नाही. आज आमचं राज्य असतं, तर केवळ ४ महिन्यातच ओबीसींचं आरक्षण, आम्ही परत मिळवून दिलं असतं. त्यामळे, या सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्ध भाजप २६ तारखेचं आंदोलन करत आहे.मात्र, यानंतरही आम्ही शांत बसणार नाही. लक्षात ठेवा, जर ओबीसीला फसवाल तर खबरदार! भाजप शांत बसणार नाही! हे सरकार पळपुटं आहे,” अशी तोफ डागली आहे.
या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाही.
जमत नसेल तर आम्हाला सांगा.
केवळ इच्छाशक्ती असावी लागते.
भाजपा २६ तारखेचे आंदोलन करून शांत बसणार नाही. ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर शांत बसणार नाही. त्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) June 24, 2021
तसेच, ओबीसी आरक्षणासंबंधातील इम्पेरिकल डाटा केंद्र सरकारने दिला नाही म्हणून या सरकारकडून सांगितलं जातं. पण, इम्पेरिकल डाटाचा मुद्दा, ५० % आरक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा आला, तो १३ डिसेंबर २०१९ ला. त्यावेळी राज्यात होतं महाविकास आघडीचं सरकार. यांनतर सरकारला फक्त राज्य मागासवर्ग आयोग गठीत करायचा होता, एक अधिसूचना काढायची होती, इम्पेरिकल डाटा जमा करा आणि हे सर्वोच्च न्यायालया फक्त कळवायचं होतं की, प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पण १५ महिने यांनी राज्य मागासवर्ग आयोगच तयार केला नाही. त्या गेल्या १५ महिन्यात या सरकारनं काय, झोपा काढल्या काय? त्यामुळे, हे पाप महाविकास आघाडी सरकारचं आहे,” ” असा घणाघात त्यांनी केला आहे.
महाराष्ट्राची आजची परिस्थिती जी आहे, त्याला सरकार म्हणता येईल का?
मंत्री झाले एकेक विभागाचे राजे अन् प्रत्येक विभागात एकेक वाझे, अशी अवस्था : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis https://t.co/9uqnYZ8O9e
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) June 24, 2021
“तुम्हाला शक्य नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही पुढच्या ४ महिन्यातच इम्पेरिकल डाटा तयार करुन, ओबीसी आरक्षण पूर्ववत केलं नाही, तर पदावर राहणार नाही,” असं सांगत त्यांनी, “या सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्ध भाजप २६ तारखेचं आंदोलन करत आहे.मात्र, यानंतरही आम्ही शांत बसणार नाही. लक्षात ठेवा, जर ओबीसीला फसवाल तर खबरदार! भाजप शांत बसणार नाही! जोवर हे आरक्षण पूर्ववत होत नाही, तोवर या सरकारला झोपू देणार नाही. तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही मदत करु. तुमच्याकडे शहाणे आहेत. काही अतिशहाणेही आहे. तरीही आमच्यासारख्या अर्धशहाण्यांकडून थोडं ऐका,” असा खोचक टोला लगावत त्यांनी, ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
Read Also :
- शाळेत जाण्यासाठी शिक्षिकांची जीवघेणी कसरत; या शिक्षिकांचा वनवास कधी थांबणार?
- “महाराष्ट्रात जे चाललंय त्याला सरकार म्हणता येईल का?”, फडणवीस ठाकरे सरकारवर गरजले
- आव्हाडांनी घेतली फडणवीसांची भेट! मुख्यमंत्र्यांना देखील नाही कल्पना
- परमबीर सिंग प्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा! भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर
- “काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकला, तर…” जयंत पाटलांचे नवीन आघाडीवर मोठे भाष्य