मुंबई : आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांकडून ठाकरे सरकारची चांगलीच कोंडी करण्याचे प्रयत्न चालू असल्याचे, आजच्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत दिसून आले. आज, मागच्या वर्षीसारखी यावर्षीही भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक, ऑनलाईन पद्धतीनं झाली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे इतर प्रमुख नेते आणि चौदाशे कार्यकर्ते उपस्थित होते.
हे पण वाचा, परमबीर सिंग प्रकरणी अजित पवारांचीही सीबीआय चौकशी करा! भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर
यावेळी, कार्यकारिणीला संबोधताना फडणवीसांनी, आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे,” असा सणसणीत टोला लगावत त्यांनी, या सरकारच्या मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव, श्रेयवादाची लढाई आणि भ्रष्टाचारासाठी चढाओढ चालू असल्याची टीका केली. आम्हाला प्रत्येक विभागातला एका वाझेचा पत्ता माहित आहे आणि तो सांगता येऊ नये, म्हणून हे अधिवेशन २ गुंडाळण्यात येत आहे,” असं म्हणत, “हे तर वसुली सरकार आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
विविध विभागातील वाझेंचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे.
तो आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोन दिवसांचे : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis pic.twitter.com/RVUASSiogM— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) June 24, 2021
तसेच, “महामारीचे सर्वाधिक रुग्ण राज्यात सापडत आहेत, त्यामुळे माझ्यासमोर असा प्रश्न आहे की, सध्या राज्यात जे सुरु आहे, त्याला सरकार म्हणता येईल का? हे कसलं महाराष्ट्र मॉडेल हे मॉडेल महाराष्ट्र नसून, मृत्यूच्या सापळ्याचे मॉडेल आहे,” असा घणाघात करत त्यांनी, “भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार यांनी बरबटलेलं हे सरकार आहे. या सरकारमधला प्रत्येक मंत्री, स्वत:ला मुख्यमंत्री समजतो. इथे रोज निर्णय होतात आणि एका तासात स्थगिती आणि पुन्हा मंजूरी मिळते. त्यामुळे, हे सरकार आहे की सर्कस आहे?, असा प्रश्न पडतोय. मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का?,” असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी सरकारला केला आहे.
हे पण वाचा, “काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकला, तर…” जयंत पाटलांचे नवीन आघाडीवर मोठे भाष्य
ओबीसी आरक्षणावर बोलताना त्यांनी, “हे आरक्षण केवळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं आहे. या सरकारने मागच्या १५ महिन्यांत मागासवर्गीय आयोगाची स्थापनाच केलेली नाही. आज आमचं राज्य असतं, तर केवळ ४ महिन्यातच ओबीसींचं आरक्षण, आम्ही परत मिळवून दिलं असतं. त्यामळे, या सरकारच्या नाकर्तेपणाविरुद्ध भाजप २६ तारखेचं आंदोलन करत आहे.मात्र, यानंतरही आम्ही शांत बसणार नाही. लक्षात ठेवा, जर ओबीसीला फसवाल तर खबरदार! भाजप शांत बसणार नाही! हे सरकार पळपुटं आहे,” अशी तोफ डागली आहे.
हे पण वाचा, आंबिल ओढा कारवाईशी पुणे पालिकेचा संबंध नाही; महापौर मुरलीधर मोहोळांनी हात झटकले
दरम्यान, राज्यात चक्रीवादळग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नती आरक्षण, कोरोना काळातील भ्रष्टाचार, आशा वर्कर्स, धनगर आरक्षण, प्रलंबित नियुक्त्या, एमपीएससी परीक्षा, कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी, परिचारिकांसह कोरोना योद्ध्यांचे मानधन, कायदा सुव्यवस्था, सत्ताधारी पक्षांतील मतभेद आणि त्यामुळे निर्णयांवरून जनतेच्या मनात होणारा संभ्रम असे अनेक महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा आणि सरकारने उत्तर देणं अपेक्षित असताना, महामारीचं कारण देऊन सरकारने अधिवेशन २ दिवसांत गुंडाळण्याच्या इरादा केला आहे, या मुद्द्यावरून भाजपने आज आक्रमक बाणा अवलंबलेला पहायला मिळाला आहे.
Read Also :
- आव्हाडांनी घेतली फडणवीसांची भेट! मुख्यमंत्र्यांना देखील नाही कल्पना
- आमची घरे तोडली.., आमच्या माणसांना पोलिस मारतायं.., आम्ही कुठे जायचं..- चिमुकला
- आंबिल ओढा कारवाईला सत्ताधारी भाजपच जबाबदार; खासदार वंदना चव्हाण संतापल्या
- बुलढाण्यातील राजकीय समीकरणे लवकरच बदलणार? प्रसेनजीत पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- बाळासाहेबांचं नाव दिल्याने कामं वेगात पूर्ण होत असतील, तर या प्रकल्पालाही त्यांचंच नाव द्या!