नागपूर – विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पण, भाजपचे नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य टुरिझमवर गेले आहेत. यावर काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतलाय. सहलीला जाणं हा आचारसंहितेचा भंग नाही का, असा प्रश्न काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.
एसटी संपकऱ्यांवर नव संकट: यवतमाळमधील ५१ एसटी कर्मचाऱ्यांची बदली, तर ३०१ जणांचे निलंबन
नागपूर विधान परिषदमध्ये मत फुटू नये म्हणून भाजपने आपले मतदार सहलीला नेले. त्यावर काँग्रेस पक्षानं आक्षेप घेतला. जे सहलीला गेले ते 15 दिवसांनंतर शहरात येतील. त्यांची कोरोना चाचणी करायला पाहिजे, अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी केली. सहलीला गेलेल्यांपैकी एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर सगळ्या शहरात कोरोना पसरेल. त्यामुळे त्यांची नागपुरात येताच कोरोना चाचणी करावी, अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे.
काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार छोटू भोयर यांनी या प्रकरणावरून निवडणूक आयोगाकडं तक्रार केली आहे. मतदारांना सहलीला पाठवून भाजपनं आचारसंहितेचा भंग केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. सहलीच्या खर्चाची चौकशी करावी, यात आचारसंहिता भंग झाल्याचं भोयर यांनी म्हटलं. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारचे गटतट नाहीत. त्यामुळं काँग्रेसचाच विजय होणार असल्याचा आशावाद काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आहे.
Read Also :
- शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट; सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितिन पाटलांच्या गळ्यात
- ओमायक्रॉनची चिंता वाढली: राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार? अजित पवार म्हणतात…
- देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित; प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण
- वीर सावरकरांबद्दल जो वाद झाला तो दुर्दैवी, त्यांना मराठी माणूस विसरू शकत नाही – शरद पवार
- एक बाई स्वातंत्र्याला भीक म्हणते आणि त्यावरती एकही साहित्यिक बोलत नाहीत – बाळासाहेब थोरात