मुंबई : ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणुने राज्याची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनचे राज्यात आता ९ रुग्ण झाले आहेत. रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये ६ रुग्ण आढळले आहेत. पुण्यामध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. कल्याण डोंबिवलीमध्येही २ रुग्ण पॅाझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडे टेन्शन वाढले आहे. लॉकडाऊनमधून आताच कुठे राज्याने मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली होती. त्यातच आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.
लहू बालवडकर “फस्ट एड पॉलिक्लिनिक” आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
”ओमायक्रॉन बाबत आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. सध्या वेगवेगळ्या देशातून जे येत आहेत त्यांच्याबाबत कडक भूमिका केंद्राने घ्यायला हवं. सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळवर नियमांचं पालन होतं आहे की नाही याकडे लक्ष द्यायला हवं,” असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
“बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर आणखी काय अपेक्षा करणार”
अजित पवार म्हणाले, ”आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियमांचं पालन होतं आहे की नाही, याकडे लक्ष द्यायला हवं. कारण कोरोनाची सुरुवात मुळात भारतात एक जोडपं दुबई वरून आलं होतं आणि त्यांनी प्रवास केल्यानंतर त्यांच्या सोबतच्या ड्राइव्हरला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याचा प्रसार झाला होता. आत्ताच्या देखील काळात वेगवेगळ्या राज्यात एक दोन रुग्ण सापडत आहेत. पुण्यात जे कुटुंबीय बाधित आहेत त्यामध्ये लहान मुलांना बाधा झाली आहे. त्यामुळे केंद्राने आणि डब्ल्यूएचओने याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची नितांत गरज आहे. देशपातळीवर आरोग्य विभाग आणि डब्ल्यूएचओ नवं नियमांबाबत एक सूचना काढणं गरजेचं आहे. जे दोन डोस घेतलेले आहेत त्यांना लागण झाली आहे. त्यामुळे बूस्टर डोस बाबत देखील केंद्राने निर्णय घ्यायला हवा. आपल्याकडे बूस्टर डोस उपलब्ध आहेत.
ओमिक्रॉनचं महाराष्ट्रात पाऊल; अकोला जिल्ह्यात जमावबंदी लागू
”राजकीय लोकांच्या लग्नात प्रचंड गर्दी पाहिला मिळाली. लोकं अजिबात ऐकत नाहीत. त्यामुळे देशपातळीवर नियमांबाबत निर्णय झाला तर प्रत्येक राज्य त्याची अंमलबजावणी करेल. बूस्टर डोस बाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे ज्यांनी याबाबत संशोधन केले आहे त्यांनी बूस्टर डोस घ्यायचा का नाही ते स्पष्ट करावे, बुस्टर डोस का घेण्यात यावा किंवा का घेण्यात येऊ नये, याचं कारण देखील स्पष्ट करावं,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित; प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचे प्रकरण
- वीर सावरकरांबद्दल जो वाद झाला तो दुर्दैवी, त्यांना मराठी माणूस विसरू शकत नाही – शरद पवार
- एक बाई स्वातंत्र्याला भीक म्हणते आणि त्यावरती एकही साहित्यिक बोलत नाहीत – बाळासाहेब थोरात
- लोकप्रियतेमुळे नव्हे, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार; मोहितेंनी कोल्हेंना खडेबोल सुनावले
- भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या अडचणीत वाढ; काँग्रेसच्या छोटू भोयर यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार