मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने राज्याचे माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेच्या निवडणुकीतील पराभवाचे शल्य बाळगूनही भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून सातत्याने चर्चेत असल्याने त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. यावर आता महाविकास आघाडीतील राजकीय नेत्यांनी भाजपने अनिल बोंडे यांना उमेदवारी दिल्यानंतर जोरदार टिका केली आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनिल बोंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्र्यांनी मान राखला नाही, असं बोलणं चुकीचं”; शाहु महाराजांचं गोप्यस्फोट
अनिल बोंडे या ना त्या कारणाने राजकीय वातावरणात सतत चर्चेत राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीत त्यांना मोर्शी मतदार संघातून पराभव स्वीकारावा लागला तरी ते भाजपच्या सर्व आंदोलनात, कार्यक्रमांमध्ये सक्रीय राहिले. त्यांनी शरद पवारांना देखील अगदी खालच्या पातळीवर जाऊन टिका केली होती. त्यावरून पवार साहेबांवर नीच पातळीवर टीका करणाऱ्या, हातावर हात देऊन बसाल तर तुमच्या लेकीबाळींवर हिजाब घालण्यासाठी वेळ येईल, अधिकाऱ्याला फटके मारा, नाना पटोले यांचा पंजा छाटला जाईल, अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या व तहसीलदारांना मारहाण केल्यामुळे शिक्षा झालेल्या बोंडेना चक्क राज्य सभा, अशी खोचक टिप्पणी अमोल मिटकरींनी केली आहे.
तर राज्यसभेच्या उमेदवारीवरून भाजपनेते किरीट सोमय्यांवर देखील अमोल मिटकरींनी निशाणा साधला आहे. तथ्यहिन घोटाळे बाहेर काढताना रात्रंदिवस घसा ओरडुन ओरडुन रोज पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. असंही ते म्हणाले.
पालकमंत्री बदलने म्हणजे बाजारातला भाजीपाला आहे का? उजनी धरण्याच्या पाण्यावरून भरणे भडकले
दरम्यान, भाजपने पियुष गोयल यांना पुन्हा एकदा संधी दिली असून, अनिल बोंडेंसह भाजपने धनंजय महाडिक यांच्या नावाने तिसरा उमेदवार दिला आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये रंगत वाढण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेने देखील तिसरा उमेदवार म्हणून संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, तर शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Read also:
- मुंबई महापालिकेवर कमळ फुलणार; सट्टा बाजारात भाजपला सर्वात पसंती
- “मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?
- लोकसभेच्या निवडणुकीत MIM अन् वंचितने भाजपकडून 1 हजार कोटी रूपये घेतले; चंद्रकांत खैरे
- “बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम”; शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
- “साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही, मग हा रिसॉर्ट कुणाचा”? सोमय्यांचा अनिल परबांना सवाल