मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली असून मोठी रणनिती तयार केली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी कमीत कमी ४५ जागा जिंकल्या पाहिजेत, या हिशोबाने आता विधानसभांच्या कामगिरीवर भाजपकडून आमदारांना लोकसभेचं तिकीट दिलं जाणार आहे. यातच आता राज्यातील भाजपचे सात दिग्गज आमदार लोकसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा…“शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही?” भाजपचा कडवा सवाल
मध्यप्रदेशात आगामी महिन्यात विधानसभा निवडणुकां होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी उतरवले जाऊन भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही विधानसभेच्या आराखड्यात उतरविले जाण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र वेगळं गणित आहे.
हेही वाचा…जगातील सर्वात पहिला छत्रपतींचा सोन्याचा ‘सुवर्ण मंदिर’, सर्वात मोठा ध्वज, सर्वात मोठा पुतळा,” शरद सोनवणेंनी केली मोठी घोषणा
दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर, मंत्री गिरीश महाजन यांना रावेर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना वर्धा, आकोल्यातून आकाश फुंडकर, राम सातपूते सोलापूर, मंत्री रविंद्र चव्हाण किंवा संजय केळकर यांना ठाणे तर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून तिकीट देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरविले जाऊ शकतात.
READ ALSO :
हेही वाचा…फडणवीसांची खेळी यशस्वी, तब्बल २० दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी समाजाचे उपोषण मागे
हेही वाचा…ठाकरे गटाचा थेट विधानसभा अध्यक्षांनाच दणका, त्यामुळे रद्द करावा लागला परदेश दौरा
हेही वाचा…“राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही, जनता तुमच्यावरच.., “कोर्टाचा दिलासा मिळल्यानंतर रोहित पवारांचा रोख कुणाकडे ?
हेही वाचा…लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट अन् भाजप भिडले, अन् शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी थेट मशाल चिन्हच ठेवलं, एकच चर्चा
हेही वाचा…मोठी बातमी..! मुंंबई हायकोर्टाचा रोहित पवारांना मोठा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाने दिले आदेश