सिंधूदूर्ग : रत्नागिरी सिंधूदूर्ग लोकसभा मतदारसंघावरून सध्या शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप नेते आणि कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी हा मतदारसंघ भाजपकडेच राहणार असल्याचं सांगितलं. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या निवडणूक लढविण्यास तयार असून हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळावा, याची हालचाली सुरू आहे. परंतु भाजपने त्यावर आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा…“जगाला दाखवण्यासाठी गांधी आणि मनामध्ये गोडसे हे भाजपाचे ढोंग!” काॅंग्रेसची जोरदार टिका
भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपकडे राहणार असून कुणाला निवडणुक लढवायची असेल तर त्यांनी भाजपने प्रवेश करावा. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीचा वरिष्ठ विचार करतील असे नितेश राणे यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर लवकरच करारा जबाब मीलेगा अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती.
हेही वाचा…सदावर्तेंकडून गोडसेचं उदात्तीकरण, “भाजपचा हात असल्याशिवाय अशी पिलावळ..,” वडेट्टीवारांची भाजपवर जोरदार टिका
दरम्यान, नितेश राणे यांच्या विधनानंतर किरण सामंत यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिला होता. या संपुर्ण प्रकारानंतर किरण सामंत यांनी आपल्या व्हाटस्अप डीपीला ठाकरे गटाची निशाणी मशाल हे चिन्ह ठेवले होते. मात्र, याची चर्चा सुरू होताच त्यांनी मशालीच्या चिन्हाचा डीपी बदलला. पण या प्रकारावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! मुंंबई हायकोर्टाचा रोहित पवारांना मोठा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाने दिले आदेश
हेही वाचा…“शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही?” भाजपचा कडवा सवाल
हेही वाचा…जगातील सर्वात पहिला छत्रपतींचा सोन्याचा ‘सुवर्ण मंदिर’, सर्वात मोठा ध्वज, सर्वात मोठा पुतळा,” शरद सोनवणेंनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…“सकाळी शाळा, अन् सांयकाळी शाळेच्याच मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स,” शिक्षणमंत्री केसरकर कारवाई करणार का ?
हेही वाचा…महाराष्ट्रातील लोकशाहीचा घात होत असताना नार्वेकर ‘घाना’ला का जात आहे ? ठाकरेंचा हल्लाबोल