चंद्रपूर : ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावा, तसेच ओबीसी समाजातील आरक्षण मराठा समाजाला न देण्यात यावा, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले ओबीसी समाजाचे नेते रवींद्र टोंगे, विजय बलकी आणि प्रेमानंद जोगींच उपोषण आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी पाजून सोडवले आहे.
हेही वाचा…जगातील सर्वात पहिला छत्रपतींचा सोन्याचा ‘सुवर्ण मंदिर’, सर्वात मोठा ध्वज, सर्वात मोठा पुतळा,” शरद सोनवणेंनी केली मोठी घोषणा
तब्बल २० दिवसापासून उपोषणासाठी बसलेल्या ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्वच मंंत्री, पदाधिकारी आणि ओबीसी समाजाचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. त्यानंतर आज प्रत्यक्ष उपोषणाच्या ठिकाणी जाऊन कोणत्याही समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. असं आश्वासन दिल्यानंतर ओबीसी समाजातील नेत्यांनी आपलं उपोषण सोडलं.
हेही वाचा…“सकाळी शाळा, अन् सांयकाळी शाळेच्याच मैदानावर गौतमी पाटीलचा डान्स,” शिक्षणमंत्री केसरकर कारवाई करणार का ?
दरम्यान, मराठा ओबीसी वाद निर्माण होणार नाही याची सरकार काळजी घेत आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारची सकारात्मक भुमिका असून मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मुख्यमंत्र्यांनी काल यासंदर्भात आश्वस्त केलं आहे. इतर मागण्यांसंदर्भातही राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. सरकारने जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण करण्यात येतील असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाचा थेट विधानसभा अध्यक्षांनाच दणका, त्यामुळे रद्द करावा लागला परदेश दौरा
हेही वाचा…“राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही, जनता तुमच्यावरच.., “कोर्टाचा दिलासा मिळल्यानंतर रोहित पवारांचा रोख कुणाकडे ?
हेही वाचा…लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट अन् भाजप भिडले, अन् शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी थेट मशाल चिन्हच ठेवलं, एकच चर्चा
हेही वाचा…मोठी बातमी..! मुंंबई हायकोर्टाचा रोहित पवारांना मोठा दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत कारवाई न करण्याचे कोर्टाने दिले आदेश
हेही वाचा…“शरद पवार सरकारमध्ये असताना मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही?” भाजपचा कडवा सवाल