मुंबई : शिवसेना-भाजप मधल्या संघर्षाला आता आणखीन धार आल्याचे दिसत असून, भाजप आमदार नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी, माहीम इथल्या भाजप कार्यालयाच्या उदघाटनावेळी शिवसेनेवर केलेल्या बोचऱ्या टीकेनंतर, शिवसेना नेते देखील त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक पद्धतीने व्यक्त होऊ लागले आहेत.
कुणी थप्पड देण्याची भाषा करु नका, अशी थप्पड मारु की कोणी उठणार नाही – उद्धव ठाकरे
या पार्श्वभूमीवर, शिवसेनचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तुन, “भाजप हा कधीकाळी निष्ठावंत आणि जमिनीवरील कार्यकर्त्यांचा पक्ष होता. एका असामान्य विचाराने भारलेली हिंदुत्ववादी विचारांची पिढीच या पक्षात होती, पण आता पक्षात निष्ठावंतच ङोईजड झाले असल्याने, या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे. भाजपत आता निष्ठावंतांना भंगारात आणि उपऱ्यांना, बाटग्यांना पालखीत नाचवलं जातंय,” असा हल्लाबोल ‘रोखठोक’ मधून केला गेला आहे.
भाजपमधील भुंकणाऱ्या लोकांचे तोंड बंद करायला फारसा वेळ लागणार नाही – विनायक राऊत
“शिवसेनेला स्थापनेपासून सगळ्यात जास्त त्रास दिला, तो आपल्यातल्याच बाटग्यांनी. बाटगा जोरातच बांग देतो आणि निष्ठावान आहोत यासाठी लक्ष वेधून घेतो, प्रसंगी जिभेवाटे गटारही मोकळे करून सर्वत्र दुर्गंधी पसरवतो. यामुळेच आज कमळाचे पावित्र्य व मांगल्य कोमेजून गेले आहे. त्या बाटग्यांची दखल घेण्याची इथे गरज नाही, मात्र पुन्हा कुणी फोडा-झोडाची भाषा करेल, त्यांनी शिवसेना भवनाच्या आसपास मैलभर परिघात येऊन पाहावं. तुमची तीही कुवत नाही.
आम्हाला वाट्टेल तिथे कार्यालय उभं करू, मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेना लिहिलेलं नाही!
“जनता पक्षाच्या काळातही काहींनी असाच उत्पात केला. शिवसेना भवनावर दगड मारण्याचा प्रयत्न केला, त्यांची पार्सले कोणत्या स्थितीत घरी किंवा दवाखान्यात पोहोचली, याचा इतिहास सध्याच्या भाजपतील बाटग्यांनी समजून घ्यावा. याच शिवसेना भवनाशी पंगा घेतल्याने त्यांचा तो जनता पक्ष भविष्यात औषधालाही शिल्लक राहिला नाही,” असं लिहीत, “आता भाजपचा अंतकाळ जवळ आला आहे. त्यांची पावले ज्या पद्धतीने वेडीवाकडी पडत आहेत त्यावरून हे स्पष्ट होत आहे,” अशी टीका भाजपवर केली गेली आहे.
दरम्यान, भाजप आमदार नितेश राणेंनी, “मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेना लिहिलेलं नाही!” तर लाड यांनी, “वेळ आली तर शिवसेना भवन फोडू,” असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिकांनी, सेनानेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवलीय. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थपडीची भाषा केली आहे, तर ‘सामना’तुन, “शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, असा इशारा दिला गेला आहे.
Read Also :
- “घटना समुद्रात बुडवा” भाजपने लोकशाही सोडून ठोकशाही आणली; गणेश बीडकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा – काँग्रेस
- संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, पण पॅकेज जातं कुठे? असली थोतांडं करणार नाही!
- आमचा पक्ष मारझोड करणारा पक्ष नाही ; दरेकरांचा शिवसेनेवर टीका
- बीडीडी चाळ पुनर्विकास: सेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो पाहून भाजपचा जळफळाट?
- आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….