मुंबई : माहीममध्ये राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. “आमचा कार्यकर्ता हक्कानं जिथे जाऊन, जनतेची सेवा करू शकतो, त्या ठिकाणी आम्ही कार्यालय उभं करू. शिवसेनाभवनसमोर कार्यालय उघडलं तर बिघडलं कुठं?, मुंबईच्या सर्व वॉर्डात पक्षाची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्हाला वाट्टेल तिथे कार्यालय उभं करू, मुंबईच्या प्रॉपर्टी कार्डवर शिवसेना लिहिलेलं नाही!” असा घणाघात त्यांनी केला.
गडकरीजी, खचलेल्या रस्त्यांना आणि महाराष्ट्राला तुमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे! – मुख्यमंत्री
काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले, आज त्याच ठिकाणी भाजप कार्यालय उघडत आहे. हा शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न आहे का, असं विचारलं असता, “आम्ही त्यांना चोपलं होतं, पण डिवचण्यासाठी आज ते आलेच कुठं? मी नाराज आहे. मी अपेक्षा ठेऊन आलो होतो. ते माझ्या स्वागतला आले असतील, पण राणेंसमोर त्यांची लायकी काय? वाटलं होतं ते स्वागत करतील, पण सांगा त्यांना पुढच्या वेळेस ताकदीने या!” असं आवाहन त्यांनी केलं.
“ते कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिकच राहणार!”
तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणेंवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले, “हो! आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोतच आणि मरेपर्यंत राहू! आम्हाला त्याचा अभिमान आहे, पण संजय राऊतांनी हे आधी सांगावं की तुम्ही खरंच शिवसैनिक आहेत का? की तुम्ही शरद पवारांचे लोंमते आहात? तुम्ही कुणासाठी काम करता? शिवसेनेसाठी की राष्ट्रवादीसाठी? हे आधी त्यांनी सांगावं, मग आम्ही आमची ओळख सांगू. त्यांनी आमची ओळख सांगू नये,” अशी जोरदार टीका त्यांनी केली.
“नाना पटोले-अनिल देशमुख बनू नका”च्या टीकेला, “अंगावर आलात तर शिंगावर घेऊ”ने प्रत्युत्तर
यावेळी, दीपक केसरकारांबद्दल त्यांना विचारलं असता, त्यांनी “कोण आहेत ते?” असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली आणि “आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही भाजपचा भगवा फडकावणारचं. हि आज आम्ही इथे शपथ घेतो. त्यामुळे जसा आज आमची मुलाखत तुम्ही घेत आहात, तशीच घ्यायला २२ च्या निकालांनंतर पुन्हा या! कारण पुढचा महापौर हा भाजपचाच असेल!” असा विश्वास त्यांनी दर्शवला. त्यामुळे येत्या काळात शिवसेना-भाजपत इथे ‘कांटे की टक्कर’ अशी लढत होणार आहे हे मात्र नक्की!
Read Also :
- निर्बंध कायम, पुणेकरांना दिलासा नाहीच; वाचा महापालिकेचे नवे आदेश
- “हे निगरगट्ट सरकार लोकशाहीला घातक, जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार नाही”
- पूरग्रस्त भागात संपूर्ण वीजबिल माफी अशक्य; मात्र दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा
- “या संकटात ‘रिकामटेकडे’ काय करतायेत हे जनता पाहतीये; राऊतांनी मीडिया समोर येणं सोडून आणखी काय केलं?”
- “घटना समुद्रात बुडावा” भाजपच्या नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी