मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते नागपूर मधील कडबी चौक-पहलवान शाह दर्गा दरम्यानच्या नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ते ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होती. इथे बोलताना मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींचे जाहीर कौतुक केले. तसेच, त्यांनी गडकरींकडे मदतीची मागणीही केली.
अहमदनगरला शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख द्या; संजय राऊतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
“नितीन गडकरींचं काय वर्णन करु, मला आठवतयं राज्यात जेव्हा युतीचं सरकार आलं, तेव्हा मुंबई-पुणे शहरे त्यांनी महामार्गाने जोडली. दुसरं कोणी असतं तर मी करतो, बघतो म्हटलं असतं. मात्र, तुम्ही करून दाखवलं. आता मुंबई-नागपूर आपण आणखीन जवळ आणत आहोत. तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही देशभरात ओळख निर्माण केली आहे. त्यासाठी मला तुमचा अभिमान आहे. तुमची पुढची वाटचाल गतीने व्हावी, अशा मी शुभेच्छा देतो”, असे गौरवोद्गार काढले.
“लोकशाही वाचवा, देश वाचवा”, ममतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; घेतली शरद पवारांची भेट
यावेळी त्यांनी, “नितीनजी मला आणखी एका कामासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. कोरोनाच्या संकटातच नैसर्गिक संकट आलं. तौत्केतुन सावरत असताना आता महापूर आला. महापुरात रस्त्येच्या रस्ते खचत आहेत, काही ठिकाणी घाट खचले, पूल वाहून गेले. त्यामुळे, आता नवीन रेल्वेमार्ग, रस्ते, बांधकामे, नवीन उड्डाणपूलांची मांडणी करताना तुमच्या तंत्रज्ञानाची महाराष्ट्राला गरज आहे,” असं म्हणत मदत मागितली आहे.
नागपूर येथील नवीन रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा – LIVE https://t.co/szmQlyDc3q
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 31, 2021
महापुरामुळे तब्बल ८०० कोटी रुपयांचे नुकसान, १०० डॉक्टरांचे पथक युद्ध पातळीवर – आदिती तटकरे
दरम्यान, कालच गडकरींनी, “दिल्लीत मी अपघाताने आलो. मी यायला तयार नव्हतो. जबरदस्तीने आलो. मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी साहित्य, मराठी कविता, मराठी इतिहास हा वेगळा आहे. ही माझी कुणावर टीका नाही, पण मराठी सारस्वाताचा आणि महाराष्ट्राचा आम्हाला अभिमान आहे. सगळीकडेच महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा दबबबा आहे. महाराष्ट्र अजून सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली व्हावा, असं स्वप्न आहे,” असं त्यांनी म्हटलं होतं.
Read Also :
- “गुजरात मॉडेल हा मोदींचा खोटेपणा, ‘चायवाला’ सांगून त्यांनी देशाला मुर्खात काढलं”
- “मोठा भाऊ म्हणून केंद्राने जबाबदारी घ्यावी, भेदभाव न करता भरीव मदत द्यावी” – एकनाथ शिंदे
- पंतप्रधानांनी यावेळी तरी महाराष्ट्रावरून घिरटी मारावी आणि गुजरातला देतात तशी तातडीची मदत द्यावी!
- ‘मनसे-भाजपा युतीवर बोलण्यात काही अर्थ नाही’, विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य
- “GST भरायला नकार द्या! मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही तुमच्याकडे येतील” – प्रल्हाद मोदी