नवी दिल्ली : राजधानीत मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरूच असून, प.बंगालमध्ये भाजपला पराभवाची धूळ चाखायला लावल्यानंतर, आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, केंद्रातून भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांत पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
महापुरामुळे तब्बल ८०० कोटी रुपयांचे नुकसान, १०० डॉक्टरांचे पथक युद्ध पातळीवर – आदिती तटकरे
ममता २६ जुलैपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं, गृहमंत्री अमित शहा यांची पहिल्यांदा भेट घेतली, नंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्यानंतर, गुरुवारी त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची भेट घेऊन त्यांच्याशी काही मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे.
I talked to Sharad Pawar.Visit was successful. We met for political purpose. Democracy must go on. Our slogan is 'save democracy save country'. We support farmers' issues too. We'll come here every 2 months: WB CM Mamata Banerjee after leaving TMC MP Abhishek Banerjee's residence pic.twitter.com/rQ1h4V5OBy
— ANI (@ANI) July 30, 2021
या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, “मी शरद पवारांशी बोलले. आमची भेट यशस्वी झाली. ही भेट राजकीय कारणांसाठी होती. लोकशाही प्रक्रिया अविरत सुरु राहिली पाहिजे. लोकशाही वाचवा, देश वाचवा, अशीच आमची घोषणा आहे. शेतकऱ्यांच्या आम्ही पाठिशी आहोत. आता दर २ महिन्यांनी आमच्या बैठका असतील”, असं त्यांनी सांगितलं.
“गुजरात मॉडेल हा मोदींचा खोटेपणा, ‘चायवाला’ सांगून त्यांनी देशाला मुर्खात काढलं”
दरम्यान, भाजप विरोधी आघाडीला बळकट करण्याच्या प्रयत्नात राष्ट्रीय स्तरावरील नेते दिसून येत असून, राजधानीत त्या अनुषंगाने या भेटीगाठी सुरु आहेत. काहीच दिवसांपूर्वी ‘राष्ट्रमंच’ची या पार्श्वभूमीवर बैठक झाली होती. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोरही दिल्लीत तळ ठोकून असून, ते सातत्याने काँग्रेस-तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे, राष्ट्रीय आणि राजकीय घडामोडींना, राजधानीत आता वेग आला आहे.
Read Also :
- “मोठा भाऊ म्हणून केंद्राने जबाबदारी घ्यावी, भेदभाव न करता भरीव मदत द्यावी” – एकनाथ शिंदे
- पंतप्रधानांनी यावेळी तरी महाराष्ट्रावरून घिरटी मारावी आणि गुजरातला देतात तशी तातडीची मदत द्यावी!
- ‘मनसे-भाजपा युतीवर बोलण्यात काही अर्थ नाही’, विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य
- “GST भरायला नकार द्या! मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही तुमच्याकडे येतील” – प्रल्हाद मोदी
- वीज बिलांची वसुली करा; पण, यशोमती ठाकूर म्हणतात…..