मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून राज्याच्या राजकारणातून जवळजवळ दूर गेलेले भाजपचे माजी मंत्री आणि नेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी कल्याण पूर्वेत भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली. त्यांनी भाजप आणि मनसे युती याबाबत वक्तव्य केलं आहे. ‘मनसे-भाजपा युतीवर बोलण्यात काही अर्थ नाही.’ असं विधान माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कल्याणमध्ये केले आहे.
हे पण वाचा: राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात, नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेच प्रत्युत्तर
राज्याच्या मुख्य राजकारणातून अलिप्त असलेले विनोद तावडे हे शुक्रवारी कल्याण पूर्वेत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘माझ्याकडे पक्षाने हरियाणाची जबाबदारी दिली असल्याने मी सध्या तिकडची जबाबदारी सांभाळत आहे.’ असं विनोद तावडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
हे पण वाचा: पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे
‘गेल्या काही दिवसांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना विनोद तावडे यांचे न दिसणे हा चर्चेचा विषय झाला होता. अखेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या याबाबतच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं आहे.’ दुसरीकडे याचवेळी त्यांना मनसे आणि भाजपच्या युतीवर देखील विचारण्यात आलं त्यावेळी ते म्हणाले की, ‘भाजपा-मनसे युती संदर्भात उगाच पतंग उडवण्यात अर्थ नाही.’
हे पण वाचा: परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ: साडेतीन कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल
दरम्यान, त्यांच्या या विधानमुळे आता राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने राज्यातील सत्ता गमावली. याचवेळी त्यांनी शिवसेनेसारखा आपला जुना मित्र देखील गमावला. अशावेळी राज्यात जर पुन्हा सत्तेच्या दिशेने पावलं टाकायची असल्यास नव्या मित्राचा शोध घेणं हे भाजपसाठी अपरिहार्य आहे. अशावेळी शिवसेनेला टक्कर देणारा एकमेव पक्ष मनसे असल्याचं भाजपला वाटतं त्यामुळेच मनसेसोबत युती करण्याबाबत भाजप विचार करु शकतं असं त्यांच्या नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा सांगितलं आहे.
Read Also :
- हेरगिरीच्या आरोपावरुन संसदेत संपूर्ण आठवडा उलटूनही गदारोळ कायम, विरोधक आक्रमक
- मी अपघाताने दिल्लीत आलो, प्रथम महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देईल, नितीन गडकरी यांचा शब्द
- काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर देऊ – नाना पटोले
- अजित पवारांविरोधात सक्षम उमेदवार देऊ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा