नगर : राज्यातल्या पूर परिस्थितीवरून विरोधक महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टिका करताना दिसत आहेत. “राज्याने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडले,” असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाचा समाचार, आज नगरमध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत घेतला. “विरोधी पक्ष मोकळा आहे. त्यांचं डोकं कायम रिकामं असतं. ते सदा न कदा आरोपच करत असतात,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
“GST भरायला नकार द्या! मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही तुमच्याकडे येतील” – प्रल्हाद मोदी
पंतप्रधान मोदी तौक्ते चक्रीवादळांनंतर नुकसानीची पाहणी करण्याकरता गुजरातला गेले पण ते महाराष्ट्रात आले नाहीत. यावेळी देखील राज्यात अभूतपूर्व अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, “पंतप्रधानांनी यावेळी तरी महाराष्ट्रावरून घिरटी मारावी आणि गुजरातला देतात तशी तातडीची हजार कोटींची मदत दयावी,” असा टोला त्यांनी लगावला आहे.
वीज बिलांची वसुली करा; पण, यशोमती ठाकूर म्हणतात…..
यावेळी त्यांनी, झारखंड आणि महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे, यावर देखील प्रतिक्रिया दिली. “विरोधक सरकार पाडण्याचा प्रयत्न करून थकलेले आहेत. लांडगा आला रे आला… असं ते म्हणतात, ते लांडगा वगैरे काही येत नाही. पण त्यांना बोलू द्या, त्यांचा वेळ जातोय ना, त्यांनी तेच करावं,” अशी खोचक टीका करत, “हे सरकार ३ वर्षाचा काळ पूर्ण करेल,” असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.
हेरगिरीच्या आरोपावरुन संसदेत संपूर्ण आठवडा उलटूनही गदारोळ कायम, विरोधक आक्रमक
तसेच, “समन्व काय असतो? सत्तेतील तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे काम करत आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने वाढत असतो. शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे, आम्ही सरकार चालवण्याचा करार केला आहे. तिन्ही पक्ष एकत्र चालवण्याची आमची भूमिका नाही. प्रत्येकाने स्वतःचे पक्ष चालवावेत, वाढवावेत. प्रत्येकाल तो अधिकार आहे. त्यात चुकलं काय, असा सवाल त्यांनी केला.
Read Also :
- पुण्यातील मेट्रो आमच्यामुळेच आली; श्रेयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपात झगडा-झगडी
- मी अपघाताने दिल्लीत आलो, प्रथम महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देईल, नितीन गडकरी यांचा शब्द
- समाविष्ट २३ गावांमधील वीजयंत्रणा सक्षम करा; अजित पवारांचे निर्देश
- काँग्रेसवर होणाऱ्या टीकेला स्वातंत्र्य वारशाची गाथा सांगत प्रत्युत्तर देऊ – नाना पटोले
- अजित पवारांविरोधात सक्षम उमेदवार देऊ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा