अहमदनगर : संपूर्ण राज्यात गावपातळीवर शिवसेनेचं संपर्क अभियान सुरू आहे. त्याच्या समारोपाचा हा काळ आहे. जरी सरकार आमचं असलं तरी पक्षाचं संघटन अधिक मजबूतीनं काम करताना दिसलं पाहिजे. ही या मागची भावना आहे. शंकरराव गडाख आल्यापासून या जिल्ह्यात संघटन वाढत आहे. शिवसेनेचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख व्हावी हा प्रयत्न आहे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. राज्यातील पूरपरिस्थितीवरून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्ष मोकळा आहे. डोकं रिकामं असतं. आरोप करतच असतात, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे
संजय राऊत यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर हल्ला चढवला. राज्याने पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्याबाबत राऊत यांना छेडण्यात आले. त्यावर राऊत यांनी ही टीका केली. विरोधी पक्ष मोकळे आहेत. मोकळा माणूस असतो. डोकं रिकामं असतं. असे आरोप करत असतात. त्यांनाही माहीत आहे. त्यांनीही सरकार चालवलंय, त्यांनीही शासन चालवलंय, अशी टीका राऊत यांनी केली.
पुण्यातील मेट्रो आमच्यामुळेच आली; श्रेयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपात झगडा-झगडी
सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे का?, असा सवालही त्यांना करण्यात आला. हा समन्वय काय असतो? तीन पक्ष स्वतंत्रपणे काम करत आहेत. करत राहतात. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने वाढत असतो. शरद पवार यांनी मागे त्याला एक उत्तर दिलं आहे. ते अधिक समर्पक आहे. आम्ही सरकार चालवण्याचं अॅग्रीमेंट केलं आहे. पक्ष एकत्र चालवण्याची आमची भूमिका नाही. प्रत्येकाने आपआपले पक्ष चालवावेत आणि वाढवावेत. आणि प्रत्येकाल तो अधिकार आहे. जेव्हा शिवसेना-भाजपची युती होती. तेव्हा दोन्ही पक्ष शतप्रतिशतचे नारे देत होते. त्यात चुकलं काय, असा सवाल त्यांनी केला.
Read Also :
- “लोकशाही वाचवा, देश वाचवा”, ममतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; घेतली शरद पवारांची भेट
- “मोठा भाऊ म्हणून केंद्राने जबाबदारी घ्यावी, भेदभाव न करता भरीव मदत द्यावी” – एकनाथ शिंदे
- पंतप्रधानांनी यावेळी तरी महाराष्ट्रावरून घिरटी मारावी आणि गुजरातला देतात तशी तातडीची मदत द्यावी!
- ‘मनसे-भाजपा युतीवर बोलण्यात काही अर्थ नाही’, विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य
- “GST भरायला नकार द्या! मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही तुमच्याकडे येतील” – प्रल्हाद मोदी