नगर : राज्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आले असताना, त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. आज नगर दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, त्याचा समाचार घेतला असून, त्यांनी राणेंवर हल्लाबोल केला. “शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला, तरी त्याची ओळख शिवसैनिकच असते. त्यात बदल होत नाही”, असा चिमटा त्यांनी काढला.
गडकरीजी, खचलेल्या रस्त्यांना आणि महाराष्ट्राला तुमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे! – मुख्यमंत्री
“संसदेत अनेक खासदार येतात-जातात. कित्येक खासदारांना कोणीही ओळखत नाही. पण शिवसेनेच्या खासदारांना सगळे ओळखतात ‘शिवसैनिक’ ही त्यांची ओळख आहे. तुम्ही पक्ष सोडून गेलात तरी ओळख ही ‘शिवसैनिक’च राहते. हा नारायण राणे… तो आमका असे कुणी म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला लोकं शिवसैनिक म्हणूनच ओळखणार. शिवसैनिक कधीच माजी होत नाही,” या शब्दांत त्यांनी राणेंवर निशाणा साधला.
अहमदनगरला शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख द्या; संजय राऊतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
यावेळी, “सत्ता असल्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना दम देऊ शकतो. गडचिरोलीला पाठवू का? अशी धमकी देऊ शकतो, सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला ‘सत्ता’ म्हणतात. त्यामुळे, शिवसेनेतही माज असायलाच हवा. कुणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. आपण वाघासारखं जन्माला आलो आहोत, वाघासारखंच मरणार, सत्ता असो की नसो, शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या”, असं त्यांनी म्हटलं.
“लोकशाही वाचवा, देश वाचवा”, ममतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; घेतली शरद पवारांची भेट
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद सातत्याने उफाळून येत आहे. नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधता आहेत. त्याला शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात शिवसेनेचं संपर्क अभियान सुरू आहे. त्या पार्शवभूमीवर संजय राऊत यांची ही नगर भेट होती. “शिवसेनेचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख व्हावी हा प्रयत्न आहे,” अशी शिवगर्जना त्यांनी यावेळी संबोधित करताना केली.
Read Also :
- महापुरामुळे तब्बल ८०० कोटी रुपयांचे नुकसान, १०० डॉक्टरांचे पथक युद्ध पातळीवर – आदिती तटकरे
- “गुजरात मॉडेल हा मोदींचा खोटेपणा, ‘चायवाला’ सांगून त्यांनी देशाला मुर्खात काढलं”
- “मोठा भाऊ म्हणून केंद्राने जबाबदारी घ्यावी, भेदभाव न करता भरीव मदत द्यावी” – एकनाथ शिंदे
- पंतप्रधानांनी यावेळी तरी महाराष्ट्रावरून घिरटी मारावी आणि गुजरातला देतात तशी तातडीची मदत द्यावी!
- ‘मनसे-भाजपा युतीवर बोलण्यात काही अर्थ नाही’, विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य