मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “केवळ माध्यमांत येऊन, वक्तव्य करून अश्रू पुसणं आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यासारख्या वेदना जाणून घेऊन अश्रू पुसणं वेगळं असतं. तौक्ते असुदे की आत्ताच महापूर आम्ही प्रत्येक वेळी लोकांसोबत होतो. त्यामुळे ‘रिकामटेकडे’ दौरा करतात की फक्त टीका, हे जनता पाहात आहे,” अशी जोरदार टीका त्यांनी केली.
“ते कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिकच राहणार!”
मुंबईत आज पत्रकार परिषदेत त्यांनी राऊतांना चोख प्रतुत्तर दिलं. “राऊत यांनी उक्ती आणि कृती याचं तारतम्य बाळगावं. या संकटात ते कधी पाण्यात उतरले?, कुठे पाहणी करायला गेले?, जनतेची दुःखे त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेतली? मग केवळ माध्यमांत येऊन अशी वक्तव्ये करणं याला काहीच अर्थ नाही,” असं म्हणत, “जनता पाहते आहे. त्यांनी सर्वसामान्य जनतेचा एकदा कानोसा घ्यावा,” असा सल्लाही दिला.
पंतप्रधानांनी यावेळी तरी महाराष्ट्रावरून घिरटी मारावी आणि गुजरातला देतात तशी तातडीची मदत द्यावी!
तसेच, राऊतांनी फडणवीसांच्या ‘पुन्हा येईन’ वरून खोचक टीका केली. यावर बोलताना, “हा विषय जुना झालाय. ते शिळ्या कढीला उगाच ऊत आणण्याचा प्रयत्नात आहेत,” असं म्हटलं. यावेळी राऊतांनी राणेंवर केलेल्या टिकेचाही समाचार घेतला. “राणे शिवसैनिक होते, ते त्यांनी कधीही नकारलं नाही. आम्ही आता सध्याच्या संकटाचा विचार करत असून, पंतप्रधानांनी राज्याला ७०० कोटी दिले आहेत, आणखीन निधी राज्याला कसा मिळेल पंतप्रधांनाकडे मागणी करू,” असं त्यांनी सांगितलं.
गडकरीजी, खचलेल्या रस्त्यांना आणि महाराष्ट्राला तुमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे! – मुख्यमंत्री
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी “विरोधी पक्ष मोकळा आहे. त्यांचं डोकं कायम रिकामं असतं. ते सदा न कदा आरोपच करत असतात,” असा हल्लाबोल आज नगर दौऱ्यावर असताना भाजपवर केला. तसेच, संसदेत अनेक खासदार येतात-जातात, पण शिवसेनेच्या खासदारांना सगळे ओळखतात. पक्ष सोडून गेलात तरी ओळख ही ‘शिवसैनिक’च राहते. हा नारायण राणे… तो आमका असे कुणी म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं,” या शब्दांत त्यांनी राणेंवर निशाणा साधला होता.
Read Also :
- अहमदनगरला शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख द्या; संजय राऊतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
- “लोकशाही वाचवा, देश वाचवा”, ममतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; घेतली शरद पवारांची भेट
- महापुरामुळे तब्बल ८०० कोटी रुपयांचे नुकसान, १०० डॉक्टरांचे पथक युद्ध पातळीवर – आदिती तटकरे
- “गुजरात मॉडेल हा मोदींचा खोटेपणा, ‘चायवाला’ सांगून त्यांनी देशाला मुर्खात काढलं”
- “मोठा भाऊ म्हणून केंद्राने जबाबदारी घ्यावी, भेदभाव न करता भरीव मदत द्यावी” – एकनाथ शिंदे