सांगली : “वीजेचे फार मोठे महत्त्व आहे, पण वीज फुकट तयार होत नाही. कोळसा आणि ऑईल विकत घेतल्यानंतर विजेची निर्मिती होते. कर्मचाऱ्यांनाही त्यांचे वेतन वेळेवर द्यावे लागते. आधीच्या सरकारने वीज कंपन्यांवर ५६ हजार कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. त्यामुळे आम्हाला ७० हजार कोटींचे कर्ज घेण्याची वेळ आली असून, याच्या आम्हाला नोटिसाही आल्या आहेत. त्यामुळे, पूरग्रस्त भागातील परिस्थिती भयानक असली, तरी संपूर्ण वीजबिल माफ करणे अशक्य आहे,” असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.
“या संकटात ‘रिकामटेकडे’ काय करतायेत हे जनता पाहतीये; राऊतांनी मीडिया समोर येणं सोडून आणखी काय केलं?”
सांगलीमध्ये त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, “पूरग्रस्त भागातील परिस्थिती भयानक असली, तरी पूरग्रस्त भागातील वीजबिले वाटप आणि वीजबिल वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. या महापुराने कोकण आणि प.महाराष्ट्रातील जिल्ह्यांत घरे, शेती यांच्यासोबतच महावितरणच्या ट्रान्सफार्मर, वाहिन्या, खांब आणि उपकेंद्रांचेही ३५ कोटींचे नुकसान झाले. पूर पूर्ण ओसरल्यानंतर नुकसानीचा आकडा आणखीन वाढेल,” अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.
“ते कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिकच राहणार!”
तसेच, अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील १७० पूरग्रस्त गावांतील ९ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यापैकी ७ लाख ६७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा, पाऊस थांबला आहे तेव्हा, पुन्हा सुरु करण्यात आला आहे. काही गावांतील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कर्मचारी आणि तांत्रिक अधिकारी रात्रंदिवस झटून काम करत आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला महापालिका निवणुकीत जागा दाखवून देवू – नाना पटोले
दरम्यान, राज्याच्या १३ जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पूराने, आतापर्यंत २०० च्या वर लोकांचा मृत्यू झाला असून, अंदाजे ४०० जनावरे आणि ६० हजार कोंबडय़ा दगावल्या आहेत. या पुराचा जवळपास १४०० गावांना फटका बसला असून, एकूण ४ लाख ३५ हजार लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना तातडीची १० हजार रुपयांची मदत जाहीर राज्य सरकारने जाहीर केली आहे.
Read Also :
- गडकरीजी, खचलेल्या रस्त्यांना आणि महाराष्ट्राला तुमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे! – मुख्यमंत्री
- अहमदनगरला शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख द्या; संजय राऊतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
- “लोकशाही वाचवा, देश वाचवा”, ममतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; घेतली शरद पवारांची भेट
- महापुरामुळे तब्बल ८०० कोटी रुपयांचे नुकसान, १०० डॉक्टरांचे पथक युद्ध पातळीवर – आदिती तटकरे
- “गुजरात मॉडेल हा मोदींचा खोटेपणा, ‘चायवाला’ सांगून त्यांनी देशाला मुर्खात काढलं”