ठाणे : ज्यांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना महापालिका निवडणुकीत दाखवून देऊ, असा गर्भित इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. ठाणे काँग्रेसचे उपाध्यक्ष विनर बिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कारण्यात आलेल्या कार्यक्रमाला नाना पटोले उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
अहमदनगरला शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख द्या; संजय राऊतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
पटोले यांनी यावेळी बोलताना मोदी सरकारवरही टीका केली. नोटबंदीकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची आर्थिक स्थिती बिकट केली आहे. मोदींनी काळा पैसा देशात आणणार होते. १५ लाख रुपये तुमच्या खात्यात टाकणार होते. पण यापैकी काहीही झालं नाही. नोटाबंदी केल्यानंतर लोक रांगेत रांगा लावून मेले. पण खात्यात १५ लाख आलेच नाहीत. अडचणींचा सामना सामान्य जनतेने केला. भाजप सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
पुण्यातील मेट्रो आमच्यामुळेच आली; श्रेयासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपात झगडा-झगडी
जीएसटी आल्यापासून हे पैसे कुणाच्या घरी गेले हे सर्वांना माहीत आहे. उद्योजक आणि व्यावसायिकांचे खिसे भरले. सामान्य माणसाला त्याचा काहीच फायदा झाला नाही. कोविड काळात कायदा लावला. एकीकडे लस नाही. लस आणि ऑक्सिजन आधी मोफत होते. आता केंद्रामुळे तेही विकत घेण्याची वेळ आली आहे. ही वेळ आणण्याचं पाप मोदी सरकारने केलं आहे, अशी टीका त्यांनी केली.
पंतप्रधान रोजगार योजनेतील ८८ टक्के उद्योगांना कोरोनाचा फटका – नारायण राणे
बिंद्रा यांच्या वाढदिवसानिमित्त यावेळी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली जाणार आहे. तसेच यावेळी तृतीय पंथीयांना रेशन किटचं वाटप करण्यात आलं. तसेच विकलांगांना व्हिलचेअरचं वाटप करण्यात आलं. या ठिकाणी किन्नर समाजाला मदत केली जात आहे. हाच मदतीचा हात विकलांगांनाही देण्यात आला आहे. केंद्र सरकार आपल्याला लस देत नाही. पण या ठिकाणी आपण लस खरेदी करून लोकांना मोफत देत आहोत. हा चांगला उपक्रम आहे. अनेक श्रीमंत लोक आपला वाढदिवस साजरा करतात. मोठ्या हॉटेलमध्ये त्यांचा वाढदिवस होतो. पण काँग्रेस कार्यकर्ते वाढदिवसाच्या दिवशी लोकांना मदत करत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.
Read Also :
- गडकरीजी, खचलेल्या रस्त्यांना आणि महाराष्ट्राला तुमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे! – मुख्यमंत्री
- “गुजरात मॉडेल हा मोदींचा खोटेपणा, ‘चायवाला’ सांगून त्यांनी देशाला मुर्खात काढलं”
- “मोठा भाऊ म्हणून केंद्राने जबाबदारी घ्यावी, भेदभाव न करता भरीव मदत द्यावी” – एकनाथ शिंदे
- पंतप्रधानांनी यावेळी तरी महाराष्ट्रावरून घिरटी मारावी आणि गुजरातला देतात तशी तातडीची मदत द्यावी!
- ‘मनसे-भाजपा युतीवर बोलण्यात काही अर्थ नाही’, विनोद तावडेंचं मोठं वक्तव्य