सातारा : ‘पिगॅसस प्रोजेक्ट’वरून संसदेत विरोधी पक्षांनी मोदी सरकारला चांगेलच धारेवर धरले आहे. याच मुद्द्यावरून आज साताऱ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. “हेरगिरीतून संविधानाने दिलेला व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार संपविण्याचे काम केंद्र सरकार व मोदी करत असून, केंद्रात बसलेले निगरगट्ट सरकार जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार नाही, हे लोकशाहीला घातक आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
पूरग्रस्त भागात संपूर्ण वीजबिल माफी अशक्य; मात्र दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांची मोठी घोषणा
“सरकारने इस्त्राईली संस्थेच्याद्वारे ३०० लोकांचे फोन टॅपिंग केले. याबाबत केंद्र सरकार स्वतःउन काहीच बोलायला तयार नाही. सध्या देशाच्या पुढे अनेक प्रश्न, समस्या आहेत. महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न यावर लोकसभेत चर्चा झाली पाहिजे, पण हे सरकार चर्चा करायलाच तयार नाही. त्यामुळे लवकरच लोकांचा उद्रेक होताना पहायला मिळेल, असा इशारा देत, “मोदींना चायवाला नव्हे देश विकणारा मोदी, असेच म्हणावे लागेल,” अशी खिल्ली पटोलेंनी उडवली.
“या संकटात ‘रिकामटेकडे’ काय करतायेत हे जनता पाहतीये; राऊतांनी मीडिया समोर येणं सोडून आणखी काय केलं?”
तसेच, “राहुल गांधी यांनी जीएसटीला ‘गब्बर सिंग टॅक्स’ संबोधले होते. नोटबंदीसंदर्भात देखील त्यांनी प्रतिक्रिया देऊन, परिणाम काय होतील हे सांगितले होते. आता देशाचा जीडीपी १० टक्केने कमी झाला आहे. पुढच्या काळात या देशाला अजून काय पाहावे लागणार आहे, हा प्रश्न आहे,” असा जोरदार हल्लाबोल त्यांनी केला. दरम्यान, ‘पिगॅसस प्रोजेक्ट’ ची बाहेरच्या देशात चौकशी सुरु आहे, देशात ती का होत नाही? सरकारही यावर काही बोलायला तयार नाहीये, त्यामुळे संसदेत सर्व विरोधकांनी सरकारला घेरले आहे.
Read Also :
- “ते कुठेही गेले तरी, त्यांची ओळख कायम शिवसैनिकच राहणार!”
- आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला महापालिका निवणुकीत जागा दाखवून देवू – नाना पटोले
- गडकरीजी, खचलेल्या रस्त्यांना आणि महाराष्ट्राला तुमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज आहे! – मुख्यमंत्री
- अहमदनगरला शिवसेनेचा जिल्हा म्हणून ओळख द्या; संजय राऊतांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला
- “लोकशाही वाचवा, देश वाचवा”, ममतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; घेतली शरद पवारांची भेट