मुंबई : कोरोना संकटात जीव धोक्यात घालून काम करतानाही सुरक्षितता आणि मानधनवाढीवर सरकार निर्णय घेत नसल्याने राज्यातील 70 हजार आशा सेविकांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
सरपंचांनो गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. सरपंचांनी गावची जबाबदारी घ्यायची आणि पंतप्रधानांनी देशाची जबाबदारी घ्यायची. म्हणजे मी घरी बसायला मोकळा, असे ट्विट करत भातखळकरांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला आहे.
सरपंचांनो गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. सरपंचांनी गावची जबाबदारी घ्यायची आणि पंतप्रधानांनी देशाची जबाबदारी घ्यायची. म्हणजे मी घरी बसायला मोकळा… pic.twitter.com/UaYKd5untG
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 9, 2021
दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही प्रश्नांबाबत पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. या भेटीवरून देखील उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?, अशी खोचक टीका भातखळकरांनी केली होती.
आज आलं अंगावर ढकललं केंद्रावरचा एपिसोड दिल्लीत. वसुलीत गर्क असल्यामुळे ठाकरे सरकारने आरक्षणाचा जो काही गुंता केलाय, तो सोडवा अशी विनंती पंतप्रधानांना करणार. झेपत नाही. कळत नाही. वसुलीपुढे सरकत नाही, अशी राज्य सरकारची तऱ्हा. सतत मागत राहता, यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?,” असं म्हणत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
Read Also :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली शरद पवारांच्या प्रकृतीबाबत विचारपूस
- ‘अमरावतीची जनता रिटेकची संधी देणार नाही, अभिनयाकडे परत फिरा’
- ‘पंतप्रधानपद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?’
- ‘खासदारकीला कोणताही धोका नाही’, नवनीत राणांना विश्वास
- पुण्यात फॅक्टरीला आग लागून मोठी जिवितहानी, सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी