मुंबई : जर मध्यप्रदेश सरकारला केंद्र सरकारने मध्यस्थी केलं तर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आरक्षणाला का स्थगिती दिली होती ? सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ट्रिपल टेस्ट करायला सांगितले होते. परंतु या सरकारने आयोग स्थापन केला नाही. त्यानंतर या सरकारने ओबीसी समाजाचं मागालेपण सर्वे केला नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी ठरविली नाही आणि हे आता केंद्रांच्या नावाने सिमगा करीत आहेत. हे फक्त पवार घराणांचं करू शकतं. असा हल्लाबोल भाजपनेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर चढवला.
काॅंग्रेसची गळती अजूनही सुरूच; कपिल सिब्बल यांची काॅंग्रेसला सोडचिठ्ठी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रोज सकाळी 6 वाजता उठतात. गेले अडीच वर्ष मग अजित पवार मंत्रालय झाडत बसले होते का ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. पवारांचा जो काही आरक्षणाबाबत दिखावा चालु आहे तो राज्यातील जनतेला आता समजला आहे. राज्य मागास आयोग नेमण्यासाठी दीड वर्ष का लागला? जो आयोग नेमला होता, तेव्हा आयोगाने म्हटले होते की, आम्ही एका महिन्यात इम्पिरीकल डेटा देतो. मग त्यांना राज्य सरकारने पैसे का दिले नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा; राजू पाटलांचा संभाजी राजेंना पाठिंबा
मुंबईत मंत्रालयावर नेलेल्या मोर्चासाठी राज्यात ठिकठिकाणाहून आलेल्या जनतेनं ओबीसी आरक्षण घालवणाऱ्या मविआ सरकारचा धिक्कार केला. महापालिका निवडणुकीच्याआडून हे आरक्षण कायमसाठीच रद्द करण्याचा या सरकारचा डाव आहे. तो हाणून पाडल्याशिवाय आम्ही कुणीच गप्प बसणार नाही. अक्षम्य दिरंगाईमुळे ओबीसी आरक्षण घालवणाऱ्या राज्यातल्या सत्ताधारी मविआ सरकारचा बुरखा आमच्या मुंबईतल्या आंदोलनानं आज टराटरा फाडला. आम्ही केलेल्या प्रश्नांवर या सरकारकडे ना उत्तर होतं ना स्पष्टीकरण. त्यामुळे दडपशाही करून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
“शरद पवारांकडे लोकांना गुळ दाखवण्याची परंपरा, फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व करावं”
दरम्यान, राज्य सरकारचा अपयश झाकण्यासाठी आज सर्व ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. तसेच आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मंत्रालयावर धडक मोर्चो नेला होता. त्यावेळी मुंबई पोलिसांनी चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Read also:
- राज्य सरकारचा बुरखा मुंबईतल्या आंदोलनानं आज टराटरा फाडला
- “मनात काहीच किंतु-परंतु नाही, परंतु मी भाजपच्या दोन नेत्यांची शिकार करणार”
- गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती, तेव्हा त्यांनी काय केले ? धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल
- “मातंग समाजाचा आधारवड राज्य सरकारने मुळासकट उपटून टाकला”
- राज्यसभा नव्हे तर आता संपुर्ण ‘राज्य’ च घेणार; संभाजी राजेंनी निवडणुकीसाठी दंड थोपटले