मुंबई : ओबीसी आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज भाजपने सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा हातात घेतला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार अशा प्रमुख नेत्यांना मुंबई पोलिसांना ताब्यात देखील घेतले.
मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा; राजू पाटलांचा संभाजी राजेंना पाठिंबा
मुंबईत मंत्रालयावर नेलेल्या मोर्चासाठी राज्यात ठिकठिकाणाहून आलेल्या जनतेनं ओबीसी आरक्षण घालवणाऱ्या मविआ सरकारचा धिक्कार केला. महापालिका निवडणुकीच्याआडून हे आरक्षण कायमसाठीच रद्द करण्याचा या सरकारचा डाव आहे. तो हाणून पाडल्याशिवाय आम्ही कुणीच गप्प बसणार नाही. अक्षम्य दिरंगाईमुळे ओबीसी आरक्षण घालवणाऱ्या राज्यातल्या सत्ताधारी मविआ सरकारचा बुरखा आमच्या मुंबईतल्या आंदोलनानं आज टराटरा फाडला. आम्ही केलेल्या प्रश्नांवर या सरकारकडे ना उत्तर होतं ना स्पष्टीकरण. त्यामुळे दडपशाही करून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
“शरद पवारांकडे लोकांना गुळ दाखवण्याची परंपरा, फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व करावं”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझं जाहीर आव्हान आहे, इम्पिरिकल डाटा, ट्रिपल टेस्ट म्हणजे काय हे त्यांनी या व्यासपीठावर येऊन सांगावं. नाना पटोले, छगन भुजबळ फसवणूक करताहेत. हे ओबीसींचे मारेकरी आहेत. यांना फक्त खुर्चीची भाषा कळते. कायदा असूनही काम न करणाऱ्यांना उघडं पाडू. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान करतो की, त्यांनी या व्यासपीठावर येऊन इम्पेरिकल डाटा म्हणजे काय, ट्रिपल टेस्ट म्हणजे काय आणि त्यांना या सर्व गोष्टींबद्दल किती माहिती आहे, ते सांगावं, असा इशाराही त्यांनी दिला.
“पुलवामाचे काय झाले बापाला विचारले का? “सोमय्यांचा ‘चिरीट तोमय्या’ उल्लेख करत दिपाली सय्यदचा सवाल
दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा डाटा केंद्राने दिला पाहिजे, असं म्हणून तुम्ही ज्या गोष्टी केंद्रावर ढकलण्याचा आग्रह धरत आहात, तो जातनिहाय डाटा नाही. तो डाटा आर्थिक सर्वेक्षणाचा आहे. सर्वच्या सर्व गोष्टी केंद्रावर ढकलणं आतातरी बंद करा, असंही त्यांनी सांगितले.
Read also:
- “मनात काहीच किंतु-परंतु नाही, परंतु मी भाजपच्या दोन नेत्यांची शिकार करणार”
- गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती, तेव्हा त्यांनी काय केले ? धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल
- “मातंग समाजाचा आधारवड राज्य सरकारने मुळासकट उपटून टाकला”
- राज्यसभा नव्हे तर आता संपुर्ण ‘राज्य’ च घेणार; संभाजी राजेंनी निवडणुकीसाठी दंड थोपटले
- काॅंग्रेसची गळती अजूनही सुरूच; कपिल सिब्बल यांची काॅंग्रेसला सोडचिठ्ठी