मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राजकीय पक्षामध्ये चांगलीच चुरस बघायला मिळत आहे. संभाजी राजें यांनी अपक्ष म्हणूनच निवडणुक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने शिवसेनेने सजंय पवार यांना उमेदवारी दिली आहे. मात्र आता यावरून शिवसेनेवर विरोधी पक्षांकडून जोरदार टिका केली जात आहे. संभाजी राजे यांना मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी पाठिंबा दिला आहे.
..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
संभाजी राजे यांना राज्यसभेसाठी शिवसेनेने पक्षात येण्याची अट घातली होती. तशाप्रकारे त्यांना मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण देखील देण्यात आलं होतं. मात्र संभाजी राजे यांनी शिवसेनेची ऑफर धुडकावून लावली. राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी ? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे, असं मत राजू पाटील यांनी म्हटले आहे.
राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव
संभाजीराजे यांना मनसे आणि मनसेचे आमदार राजूदादा पाटील यांचा पाठिंबा जाहीर झाला आहे. राजेंचा मान सन्मान कसा ठेवायचा हे आम्हास ठाऊक आहे. बाकी नाव छत्रपतींचे घ्यायचे आणि छत्रपतींच्या वंशजाच्या पाठीत खंजीर खुपसायचा ही सेना आणि महाविकास आघाडीची निती आहे. मराठा समाजाने आता तरी या कावेबाजांचा डाव ओळखावा, असं मनसे नेते गजानन काळे यांनी म्हटले आहे.
अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले
दरम्यान, राज्यातील सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की, संभाजी राजे यांच्याबाबतीत जो काही खेळ लावलेला आहे, तो लवकरात लवकर थांबवावा. राज्य सभेसाठी त्यांना प्रथम क्रमांकावर घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात यावी. अशी मराठा क्रांती मोर्चाची रोखठोक भूमिका आहे. अन्यथा असं झालं नाही तर येणाऱ्या काळात सर्व राजकीय पक्षांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशाराही मराठा क्रांती ठोक मोर्चेने दिला आहे.
Read also:
- “शरद पवारांकडे लोकांना गुळ दाखवण्याची परंपरा, फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचं नेतृत्व करावं”
- “पुलवामाचे काय झाले बापाला विचारले का? “सोमय्यांचा ‘चिरीट तोमय्या’ उल्लेख करत दिपाली सय्यदचा सवाल
- “मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्तेच्या माध्यमातुन फडणवीसांनी आरक्षण घालवले”
- राज्यसभा निवडणुकीत माजी खासदार आढळराव पाटील यांना डावलले! संजय राऊत यांनी शब्द पाळला नाही
- औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन