मुंबई : 2019 विधानसभा निवडणुकीच्या 2 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून केंद्राकडे इम्पिरीकल डेटा मागितला तेव्हा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चुका दुरूस्त करून पाठवा असे उलट टपाली कळविले होते. या इम्पिरीकल डेटासाठी न्यायालयाने तात्कालीन राज्य सरकाराला 8 आठवड्याची मुदत दिली होती. मात्र फडणवीस सरकारने या मुदतीत केंद्राकडे चुका दुरूस्त करून न पाठवल्याने ओबीसी आरक्षणाचा खुन झाला. त्यास सर्वस्वी देवेंद्र फडणवीस व भाजप जबाबदार आहे आणि तेच आज ओबीसी आरक्षणासाठी मोर्चे काढताहेत. असा घणाघात राष्ट्रावादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर लगावला.
“सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही”; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले; देवेंद्र फडणवीस
भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणामागची कपटनीती समजून घ्या. फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी SEBC आरक्षणाचा कायदा मंजूर करून घेतला. आरक्षण हा केंद्र सरकारचा विषय असल्याने या प्रक्रियेत फडणवीस सरकारने मोदी सरकारला सामील करून घेणे आवश्यक होते तसे झाले नाही. SEBC ला मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्ते च्या माध्यमातुन फडणविसांनी योजनेने उच्च न्यायालयाच्या कसोटीवर आणले. तिथे SEBC आरक्षण वैध ठरले. खरं तर केंद्र सरकारने EWC चा पर्याय निर्माण केला असताना SEBC चा आग्रह कशासाठी ? तो उघडा का पाडल्या गेला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कोल्हापुरात भाजपची मोठी खेळी; शिवसेनेच्या विरोधात तगडा उमेदवार शर्यतीत
मात्र यातही केंद्र सरकारच्या दबावाने आपल्या सोयी चा निकाल लावून विधानसभा निवडणूक जिंकायची या कपट हेतुने ओबीसी व मराठा आरक्षणाचा फक्त राजकीय वापर करण्यात भाजपा व देवेंद्र फडणवीस यांचा डाव यशस्वी झाला आहे. असंही ते म्हणाले.
संभाजी राजे यांचा राजकीय खेळ थांबवा, नाहीतर…; राज्यसभेच्या जागेसाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
दरम्यान, आगामी काही काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. त्यामुळे या निवडणुकांसाठी अजूनही ओबीसी आरक्षणाचा पेच तसाच आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये सध्या यावरून चिखलफेक सुरू आहे.
Read also:
- राज्यसभा निवडणुकीत माजी खासदार आढळराव पाटील यांना डावलले! संजय राऊत यांनी शब्द पाळला नाही
- औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
- ..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
- राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव
- अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले