पुणे : संभाजी राजे यांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राजकीय पक्षांनी संभाजी राजे यांना पाठिंबा दिला नाही तर सगळ्या पक्षांना याचे मोठे परिणाम भोगावे लागतील असा इशारा मराठा क्रांती मोर्चेचे राज्य समन्वय धनाजी साखळकर यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडणार त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाजपचाच डाव; बृजभुषण सिंह यांनीच दिली कबुली ?
राज्यातील सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की, संभाजी राजे यांच्याबाबतीत जो काही खेळ लावलेला आहे, तो लवकरात लवकर थांबवावा. राज्य सभेसाठी त्यांना प्रथम क्रमांकावर घेऊन त्यांना उमेदवारी देण्यात यावी. अशी मराठा क्रांती मोर्चाची रोखठोक भूमिका आहे. अन्यथा असं झालं नाही तर येणाऱ्या काळात सर्व राजकीय पक्षांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
इडा पिडा टळो, अन् इडीचा ससेमिरा मरो; भावना गवळी यांच्यासाठी शिवसेनेकडून यज्ञ
संजय राऊतांनी समाजमाध्यांमाशी बोलताना संभाजी राजे यांच्याविषयी भाष्य केले. संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्याअर्थी त्यांना 42 मतांची बेगमी केली असावी, असा माझा समज होता. परंतु संभाजी राजे यांच्याकडे तेवढी मते नव्हती. तेव्हा संभाजीराजे यांनी शिवसेनेकडे मदत मागितली. परंतु आम्हाला 2 उमेदवार निवडून आणायचे आहेत. मग आम्ही त्यांना आमची मतं कशी देणार? राज्यसभेतील संख्याबळ वाढवायचे आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नाहीत, असं राऊतांना म्हटलं आहे.
“बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आता बकरीसेना झाली”; नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरूवातीला संभाजी राजे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र शिवसेनेने मवाळ भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी भूमिकेत बदल केला. शिवसेना जो कोणी उमेदवार उभा करेल, त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल, असं सांगण्यात आलं. तसेच काल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची देखील भेट घेऊन संभाजी राजे यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोणाची वर्णी लागते ? त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
Read also:
- औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
- ..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
- राज ठाकरेंचं भाषण आघाडीतील प्रत्येक नेत्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज; भास्करराव जाधव
- अमित शहा, फडणवीसांवर गंभीर आरोप, तर शिवसेनेवर टिका; इम्तियाज जलील संतापले
- “सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात केलीच नाही”; ठाकरे सरकारने लोकांना मुर्ख बनविले; देवेंद्र फडणवीस