मुंबई : खासदार नवनीत राणा आणि रवी राणा स्वत: म्हणत असतील की आम्हाला पाणी देखील नाकारलं. तर आपल्याला ती गोष्ट नाकारून चालणार नाही. वादानंतर ते खासदार आहेत. हे पालिसांच्या लक्षात आलं असेल, पुढे जाऊन हे प्रकरण आपल्या डोईशी येईल असं वाटल्याने पोलिसांनी समजूत घालण्यासाठी राणांना चहा दिला असेल, असं भाजप नेते राम कदम यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणांच्या आरोपांवर पोलिसांनी केला पुराव्यांसह व्हिडीओ पोस्ट! राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
नवनीत राणा यांना न्यायालयीन कोठडीत पोलिसांकडून छळवणूक केली जात आहे. तसेच हिन दर्जाची देखील वागणुक मिळत असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. नवनीत राणांचा हा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उपस्थित केला होता. मात्र मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे या गोष्टीला खोटं ठरवत त्यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावरून आता नवनीत राणा यांच्यावर चौफेर बाजूने टिका केली जात आहे.
“शरद पवारांनी जातीयवादाला खतपाणी घातलं, म्हणून प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवला”
संजय पांडे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओ मध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे चहा पिताना दिसत आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी जो आरोप केला आहे. ते यावरून खोटं ठरत आहे. त्यावर राम कदम म्हणाले की, या व्हिडीओबाबतची विशेष स्पष्टता स्वत: खासदार नवनीत राणा देऊ शकतील. मात्र दोन गोष्टी नाकारता येणार नाहीत. मुंबई पोलीस तीन पक्षांच्या सरकारच्या दबावात करत आहे. मागच्या अडीच वर्षापासून मुंबईत मोठमोठ्या राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्यांवर अत्याचाराचं सत्र सुरु आहे. असंही ते म्हणालेत.
“औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेदरम्यान जमावबंदीचे आदेश नाहीत”; आयुक्तांनी केलं स्पष्ट
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, मंत्र्यांना कोट्यावधी रूपये देण्यासाठी खार पोलीस ठाण्यांमध्ये हैदोस मांडला गेला तो आपल्यालाा नाकारता येणार नाही. त्यामुळे चहा पितानाचं एक दृश्य या व्हिडीओत आलं असतं तरी त्या स्वत: खासदार आहेत. त्या म्हणतात मला पाणी नाकारलं. त्यामुळे आधी पाणी नाकारलं,नंतर वाद केल्यावर शांत करण्यासाठी चहा दिला का? या दोन्ही गोष्टी येतात. असंही ते म्हणाले.
Read also:
- “राणांचं समर्थन करणारा राज्यातील विरोधी पक्षही तोंडघशी पडला”; संजय राऊतांचा खोचक टोला
- महाराष्ट्र सरकारची बदनामी करतांना सरकारी चहाशी तरी इमान राखायचे; शिवसेनेकडून राणांना खोचक टोला
- मोदींनीच सांगितलं की, पवारांच्या हाताला धरून राजकारण शिकलो, मग यात जातीयपणा कसला?
- देशमुखांना दिलासा मिळण्याची शक्यता! गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला चांदिवाल आयोगाचा अहवाल
- “शकुनीमामाच्या कौरव सेनांवर फडणवीसांच्या नेतृत्वात पांडवांची सेना जिंकणार”; सदाभाऊंचा शरद पवारांवर खोचक टोला