मुंबई : मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यास आलेले राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. मात्र तुरूंगात हिन दर्जाची वागणूक मिळत असल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद हा मुद्दा मांडला होता. त्यावर आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस ठाण्यातील एक सीसीटिव्ही फुटेज ट्विट केला आहे.
“सत्तेत येण्याची प्रबळ इच्छा अन् उबळही, मात्र जी अस्वस्थता..;”राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पोलीस ठाण्यातील व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात नवनीत राणा आणि रवी राणा खुर्चीवर बसून चहा पीताना दिसत आहे. त्यात त्यांनी Do we say santhing More असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर केलेले आरोप कितपत खरं खोटे आहेत. याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
औरंगाबादमध्ये राज ठाकरे जोरदार गरजणार! राज ठाकरेंकडून निमंत्रण प्रत्रिकेचे प्रकाशन
तुरूंगात होत असलेल्या अत्याचाराबाबत नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना देखील पत्र पाठवलं होतं. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी याबाबत राज्य सरकारला विचारणा ही केली. याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे यांनी सांगितलं होतं की, नवनीत राणा यांना कोणत्याही प्रकराची वाईट वागणूक देण्यात आली नाही. त्यामुळे नवनीत राणा यांनी पोलिसांवर जे काही आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
“हनुमान चालीसातील बर्याच ओळी चुकल्या देवेंद्रजी! राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात या एकदा”
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामुळ राज्यातील राजकारण काहीसं ढवळून निघालं आहे. तसेच नवनीत राणा यांना न्यायालयाने आणखी एक धक्का देत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्याची आता पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार आहे.
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022
Read also:
- “शरद पवारांनी जातीयवादाला खतपाणी घातलं, म्हणून प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवला”
- “औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेदरम्यान जमावबंदीचे आदेश नाहीत”; आयुक्तांनी केलं स्पष्ट
- राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ! कोठडीतील मुक्काम वाढला
- “ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झालीय, आगडोंब उसळलाय, जळजळतंय त्यांनी..;” मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष टोला
- नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? आजीबाईंच्या भेटीवरून निलेश राणेंचा सवाल