मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एकच सामायिक कार्ड म्हणजे नॅशनल काॅमन मोबिलिटी कार्ड सुविधेचे लोकार्पण सोमवारी केले. त्यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, नवनीत राणा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा देखील उपस्थित केला.
उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना चांगलचं फटकारलं! न्यायालयाने याचिकाही फेटाळली
हिंदुत्व सोडल्याची गेले काही दिवस माझ्यावर टिका होत आहे. हिंदुत्व् म्हणजे धोतर आहे का? घालावे आणि मग सोडावे. जे आता आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी काय केलं आहे ? बाबरी पाडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. राममंदिर बांधण्याचा निर्णयदेखील तुमच्या सरकारने घेतलेला नाही. तर न्यायालयाने दिला आहे. मंदिर बांधतानाही तुम्ही झोळ्या पसरल्या आहेत, मग तुमचं हिंदुत्व कुठे आहे ? असा सवाल देखील त्यांनी केला.
“सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू शकतात”; काॅंग्रेसचा सोमय्यांवर खोचक टोला
ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झाली आहे, आगडोंब उसळला आहे. जळजळतंय मळमळतंय काही कळत नाही. पण त्यांनी त्यांच्या राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये, शहारांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा अंगीकारून दाखवला आहे, हे दाखवावं असं माझं आव्हान आहे. काम काहीच नाही आणि बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग असून मी काडीची किंमत देत नाही असं म्हणत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपवर अप्रत्यक्ष टोला लगावला.
सर्वपक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया ! म्हणाले आम्ही…;
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी म्हण आहे . परंतु आमच्या घरात दिवाळी असो किंवा दसरा किंवा साधू संत येतच असतात. शिवसेनाप्रमुख,माॅंसाहेब असतानाही येत होते. आताही येतात. परंतु ते नीट बोलून सांगून येतात. परंतु दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडून काढायची हे शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजावून सांगितलं आहे असंही ते म्हणाले.
Read also:
- नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? आजीबाईंच्या भेटीवरून निलेश राणेंचा सवाल
- “सत्तेत येण्याची प्रबळ इच्छा अन् उबळही, मात्र जी अस्वस्थता..;”राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
- औरंगाबादमध्ये राज ठाकरे जोरदार गरजणार! राज ठाकरेंकडून निमंत्रण प्रत्रिकेचे प्रकाशन
- “हनुमान चालीसातील बर्याच ओळी चुकल्या देवेंद्रजी! राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात या एकदा”
- “राजकारण हा आजार असेल, तर त्याचं मुळ कारण मातोश्री, अन् त्यावर फडणवीस सरकार औषध”