मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. त्यासाठी ते मुंबई दौऱ्यावर आले होते. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. त्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 80 वर्षाच्या चंद्रभागा आजीच्या घरी सहकुटुंब भेटण्यासाठी गेले होते. चंद्रभागा आजी या अलिकडेच मातोश्रीबाहेरील आंदोलनामुळे चर्चेत आल्या होत्या. आता या भेटीवर भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू शकतात”; काॅंग्रेसचा सोमय्यांवर खोचक टोला
ज्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले त्या घरात डोक्यावर अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्याला व बीएमसीला दिसला नाही. दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात परंतु नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार ? तुमच्या घरात तसा कोण संघर्ष करणारा शिल्लक पण राहिला नाही. पळून जाल मुंबई सोडून, असं ट्विट निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून केलं आहे.
सर्वपक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया ! म्हणाले आम्ही…;
तसेच काल मुख्यमंत्री BEST आयोजित नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड कार्यक्रमाला गेले आणि राजकीय बोलून निघाले. कार्यक्रम काय आहे आपण काय बोलतोय कसं बोलतोय हे भान नसलेला महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला. विरोधकांवर टीका कऱण्यासाठी व्यासपीठ राजकीय असावं हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही. असंही ते म्हणालेत.
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत गृहमंत्र्यांची मोठी खेळी! मशिदीवरील भोंग्याबाबत झाला निर्णय
दरम्यान, गेल्या काही दिवसात मातोश्री समोर चंद्रभागा आजी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या माध्यमासमोर येऊन शिवसेना हारेंगा नही, झुकेंगा नही साला असं म्हणाल्या होत्या. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे चंद्रभागा आजींच्या घरी गेले होते.
Read also:
- “सत्तेत येण्याची प्रबळ इच्छा अन् उबळही, मात्र जी अस्वस्थता..;”राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
- औरंगाबादमध्ये राज ठाकरे जोरदार गरजणार! राज ठाकरेंकडून निमंत्रण प्रत्रिकेचे प्रकाशन
- “हनुमान चालीसातील बर्याच ओळी चुकल्या देवेंद्रजी! राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात या एकदा”
- “राजकारण हा आजार असेल, तर त्याचं मुळ कारण मातोश्री, अन् त्यावर फडणवीस सरकार औषध”
- उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना चांगलचं फटकारलं! न्यायालयाने याचिकाही फेटाळली