मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत भूमिकेवरून अलिकडेच राष्ट्रवादी-मनसे राजकीय संघर्ष बघायला मिळला होता. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेच्या जाहीर कार्यक्रमात हनुमान चालिसा म्हटली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला होता. तसेच आज झालेल्या पत्रकार परिषेद देवेंद्र फडणवीस यांनी देखील हनुमान चालिसा म्हटली त्यावर आता अमोल मिटकरींनी त्यांना एक सल्ला दिला आहे.
“राज्यात हनुमान चालिसा वाचणे, राजद्रोहाचा गुन्हा होत असेल तर आम्ही 100 वेळा गुन्हा करू”
राज्यातील दोन दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. त्यावेळी त्यांनी हनुमान चालिसावरून चालेलल्या राजकारणावर बोट ठेवत भर पत्रकार परिषेद हनुमान चालिसा म्हटली. त्यावर देवेंद्रजी हनुमान चालीसातील बर्याच ओळी चुकल्या आहेत. संपुर्ण चालीसा माहीत करून घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात एकदा हजेरी लावून पुर्ण पाठ करून घ्यावा ही विनंती. असा सल्ला अमोल मिटकरींनी दिला आहे.
कोणी स्वस्थपणे भारत पाकिस्तान मॅच पाहू शकतो का? फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
इस्लामपूराच्या सभेत त्यानंतर कोल्हापूरच्या सभेत देखील अमोल मिटकरींनी हनुमान चालिसा म्हटली होती. त्यावेळी त्यांनी ब्राम्हण समाजाबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्याचाच परिणाण म्हणून पुण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं. तसेच ब्राम्हण समाजाची माफी मागण्याची विनंती केली. त्यावेळी राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
” 1980 साली सरकार बरखास्त झाल्यानंतर मी अस्वस्थ झालो नव्हतो, मात्र हल्ली काही लोकं खुप अस्वस्थ”
दरम्यान, सध्या हनुमान चालिसावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. तसेच भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
Read also:
- “राजकारण हा आजार असेल, तर त्याचं मुळ कारण मातोश्री, अन् त्यावर फडणवीस सरकार औषध”
- उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना चांगलचं फटकारलं! न्यायालयाने याचिकाही फेटाळली
- “सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू शकतात”; काॅंग्रेसचा सोमय्यांवर खोचक टोला
- सर्वपक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया ! म्हणाले आम्ही…;
- सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत गृहमंत्र्यांची मोठी खेळी! मशिदीवरील भोंग्याबाबत झाला निर्णय