मुंबई : प्रत्येकांनी आपले धार्मिक कार्यक्रम स्वत:च्या घरी केले पाहिजे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती कधीही नव्हती. राज्यात 1982 साली माझंही सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. त्यावेळी मला यासंदर्भात रात्री मुख्य सचिवांनी फोन करून सांगितलं की सरकार बरखास्त करण्यात आलं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारत- पाकिस्तान क्रिकेट सामना बघण्यासाठी गेलो होतो. सरकार येतं सरकार जातं. परंतु मी कधीही अस्वस्थ झालो नाही. परंतु हल्ली काही लोकं सत्ता गेल्यानंतर खुप अस्वस्थ झाले आहेत. असा टोला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल! सरकारी वकिलाची माहिती
देशाच्या अनेक राज्यात वीज संकट असून महाराष्ट्रात देखील वीजेची कमतरता जाणवत आहे. ही परिस्थिती लवकर बदलेल. कुठल्याही व्यक्तींनी आपल्या धार्मिक भावना अंतकरणात ठेवाव्यात. त्याचं प्रदर्शन करू नये. धार्मिक भावना भडकावून सामाजिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्र्यांना मान ठेवला पाहिजे. मुख्यमंत्रिपद ही एक संस्शा आहे त्याचा सन्मान ठेवला पाहिजे.
राजकारण तापलं! राणा दाम्पत्याला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी भाजपचं शिष्टमंडळ आज दिल्लीत गृहसचिवांची भेट घेतली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, अस्वस्थ असणारे लोक विविध मार्ग काढण्यासाठी ते अशा पद्धतीच्या खोलात जाणार. राष्ट्रपती राजवट पद्धतीच्या दमदाटी केल्या जातात. परंतु याचा काहीही परिणाम होणार नाही. राष्ट्रपती राजवट होण्याची टोकापर्यंत जाणार नाही. तसेच याबद्दल देखील चर्चा केली जाईल,असंही ते म्हणाले.
राणा दाम्पत्यानी पोलीस ठाण्यात 101 वेळा केलं हनुमान चालिसाचे पठण! ठाकरे सरकावर केले गंभीर आरोप
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. नवनीत राणा, त्यानंतर मोहित कंबोज, आणि आता किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण सध्या ढवळून निघालं आहे.
Read also:
- किरीट सोमय्यांना झालेली ‘ती’ जखम कृत्रीम? गृहमंत्र्यांनी दिले सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश
- “सत्ता गेल्यावर शिवसेनेचं वाटोळं अटळ! ठाकरे सरकारवाल्यांनो आता तरी सुधरा”;
- “मनसुख हिरेन मुख्यमंत्र्यांनी घडवला! तुझाही मनसुख हिरेन करू, अशा मला धमक्या”; किरीट सोमय्या
- राणा दाम्पत्यावर अजित पवारांची स्पष्ट भूमिका; म्हणाले..;
- किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे; देवेंद्र फडणवीस