मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. नवनीत राणा या हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर लगेचच भाजप नेते किरीट सोमय्यांवर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला. यावर आता राज्यातील राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याच पाश्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राणा दाम्पत्यानी पोलीस ठाण्यात 101 वेळा केलं हनुमान चालिसाचे पठण! ठाकरे सरकावर केले गंभीर आरोप
निलेश राणे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, राणा, खंबोज, सोमय्या यांची बाजू घेतली की परप्रांतीयांची बाजू घेतली. परंतु शिवसेना राणे, दरेकर, लाड, शेलार यांच्यावर खोटी कारवाई करते तेव्हा मराठीचा मुद्दा येत नाही. ठाकरे सरकारवाल्यांनो आता तरी सुधरा सत्ता गेल्यावर हे सगळं भारी पडणार तुम्हाला. शिवसेनेचं वाटोळं अटळ आहे. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, कारण लोकशाहीत मतं मांडण्याचा तुमचा अधिकार संपला”
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील देण्यात आली आहे. त्याचबरोबर खार येथील निवासस्थानी भाजप नेते मोहित कंबोज नवनीत राणा गेले असता त्यांच्यावर शिवसैनिकांनी अचानक हल्ला केला. त्यात त्यांच्या गाडीची काच फुटली.
चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही, कुठे हिमालयात गेले की काय? अमोल मिटकरींनी घेतला उखाणा
तर भाजप नेते हे देखील नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटण्यासाठी ते गेले असता. त्यांच्यावर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला. यात त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. त्यात त्यांच्या गाडीची पुढची काच फुटली. ती काट फुटून त्याना लागली आणि त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी आता किरीट सोमय्या दिल्लीत गृहसचिवांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.
Read also:
- “मनसुख हिरेन मुख्यमंत्र्यांनी घडवला! तुझाही मनसुख हिरेन करू, अशा मला धमक्या”; किरीट सोमय्या
- राणा दाम्पत्यावर अजित पवारांची स्पष्ट भूमिका; म्हणाले..;
- किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे; देवेंद्र फडणवीस
- नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल! सरकारी वकिलाची माहिती
- राजकारण तापलं! राणा दाम्पत्याला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी