मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना काल पोलिसांनी अटक केली. त्यांना काल पोलिसांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आलेे. तसेच काल रात्री भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील काल काही लोकांनी हल्ला केला. हनुमान चालिसा, मशिदीवरील भोंगे आणि आता भाजप नेत्यांवर झालेले हल्ले आणि राणा दाम्पत्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं.
राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली, उद्यापासून आंदोलन करू; चंद्रकांत पाटलांचा एल्गार
नवनीत राणा यांनी नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे मातोश्रीवरील हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शिवसैनिकांनी माफी मागावी, यासाठी शिवसैनिकांनी खार येथील निवासस्थानी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी राणा दाम्पत्याला त्याठिकाणी बाहेर काढण्यासाठी पोलीस पोहचले. परंतु बाहेर येण्यास त्यांनी नकार दिला, परंतु त्यानंतर मग सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
कालची संपुर्ण रात्र राणा दाम्पत्यांची पोलीस ठाण्यातच गेली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली खोट्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकरणी सांताक्रज पोलीस स्टेशनच्या कोठडीत 101 वेळा हनुमान चालीसाचे पठण केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मागासवर्गीय महिला आहे, म्हणून मला शिवसेनेकडून अपमानस्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्याचबरोबर ते माझ्याबद्दल खालच्या दर्जात बोलत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
एका जणाच्या गाडीवर वीस पंचवीस जण येत असाल, तर..; शेलारांनी दिला शिवसेनेला सज्जड दम
दरम्यान, आज सरकारी वकिलांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना 7 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली आहे. त्यांच्यावर आज न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच रात्री भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर देखील हल्ला करण्यात आला. तसेच त्याआधी मोहित कंबोज यांच्या गाडीवर देखील शिवसैनिकांनी हल्ला केला. यावरून विरोधी पक्षाकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली जात आहे.
Read also:
- “सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, कारण लोकशाहीत मतं मांडण्याचा तुमचा अधिकार संपला”
- चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही, कुठे हिमालयात गेले की काय? अमोल मिटकरींनी घेतला उखाणा
- “साहेबांनी सांगितले म्हणून मी राऊतांना खासदार केले”; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघात
- “नाद कुणाचाही करा, पण शिवसेनेचा नाही”; राणा दाम्पत्याला शिवसेनेचा खोचक टोला
- “पंतप्रधानांच्या दौऱ्यांचं कारण सांगून अमरावतीच्या बंटी बबलीने पळ काढला”