मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण राणा दाम्पत्यामुळे जोरदार चर्चेत आलं आहे. राणा दाम्पत्यांनी घेतलेल्या भुमिकेवर राज्यातील नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजप नेते मोहित कंबोज हे मातोश्री परिसरात रेकी कऱण्यासाठी आले असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर काल शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
तर नवनीत राणा यांना महाराष्ट्रातून तडीपार करा..; रिपाइंची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
राज्यातील कायदा सुवस्थेची स्थिती मोडकळीस आली आहे. राज्यात पक्षपात केला जात आहे. धनंजय मुंडेप्रकरणी वेगळा न्याय आणि गणेश नाईकांवर कारवाई केली जात आहे. गृहविभागाकडून राज्यात पक्षपात केला जात असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील केला आहे. एका जणाच्या गाडीवर वीस पंचवीस जण येत असाल, तर तुम्ही सुद्धा एकटे जाणार आहात. जशाच तशाला आम्ही देखील घाबरत नाही. लोकशाहीला लोकशाहीने उत्तर देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
मंत्र्यांच्या सरकारी लुटीवरच्या प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, म्हणाले..;
पवारांच्या घरावरील हल्ला झाला. मुख्यमंत्र्यांच्या घरावरती काल गर्दी झाली. मग यात पक्षपाती पणासाठी महाराष्ट्र आंधळा होता का ? गणेश नाईकांच्या प्रकणात वेगळा न्यात सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. रश्मी शुक्लावरती गुन्हा दाखल होत आहे. राज्यात तक्रारदार सुरक्षित नाही. लोकशाहीने लोकशाही पद्धतीने उत्तर देऊ असंही त्यांनी म्हटलं आहे.
गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दिलासा; सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी जामीन अर्ज मंजूर
दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर काल शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारच कायदा आणि सुव्यस्था खराब करणार असेल याची कुठेतरी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या हनुमान चालिसा वाद आता मोहित कंबोज हल्लापर्यंत आला आहे.
Read also:
- …मग राज्याचे गृहमंत्री काय चपात्या भाजताय का? चंद्रकांत पाटलांचा रोखठोक सवाल
- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आहेत तरी कुठे? शिवरायांच्या पुतळ्याच्याही अनावरणाला अनुपस्थिती
- पोलिसांच्या सहकार्याने सरकारने उच्छाद मांडला; मोहित कंबोज हल्लाप्रकरणी दरेकर भडकले
- “कशाला कुणाला खिजवता? नाहीतर ते महाप्रसाद देण्याची वाट पाहत आहेत”; भुजबळांचा राणांना सुचक इशारा
- सत्तेचे चटके अनेकांनी घेतलेय, तुम्हालाही घ्यायचा असेल तर..; राऊतांचा कडक इशारा