मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्लाप्रकणी अटक असेलेल्या अॅड गुणरत्ने सदावर्ते यांच्यासह 115 जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे सदावर्तेंना काहीसा प्रमाणात आता दिलासा मिळाला आहे. त्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याबरोबर गुणरत्ने सदावर्ते यांना अकोला येथील सत्र न्यायालयानेदेखील अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
“ती सिनेमातील लोक, त्यांना अजून मुंबईचं पाणी माहिती नाही”; राणा दाम्पत्यांवर राऊतांची प्रतिक्रिया
एसटी कर्मचाऱ्यांना भडकवून शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला केल्याप्रकरणी गुणरत्ने सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर राज्यातील विविध शहरात गुन्हे दाखल करण्यात आले होते. अलिकडेच सातारा पोलिसांनी त्यांचा ताबा घेतला होता. तर बीड, पुणे, सोलापूर, कोल्हापुर आणि इतर ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे नोंद कऱण्यात आले आहेत.
“वळसे पाटलांवर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं”; मुनगंटीवारांचा खोचक टोला
त्याआधी गुणरत्ने सदावर्ते यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर आता मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा देत जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्याचबरोबर इतर 115 एसटी कर्मचारी आंदोलनां देखील न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. मात्र त्यांचा जामीन अर्ज देखील मंजूर करण्यात आला आहे. त्यांना 10 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर हा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
“सुपारी घेऊन रावणांची तोंड मुंबईत फिरायला लागलीत”; किशोरी पेडणेकरांचा राणा दाम्पत्यांना टोला
दरम्यान, सातारा पोलिसांनी ताबा घेतल्यानंतर गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर अकोला येथील देखील गुन्हा नोंद होता. याप्रकरणी त्यांनी न्यायालयात अटकपुर्व अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने त्यांचा तो अर्ज मंजूर करत त्यांना एकप्रकारे दिलासा दिला आहे.
Read also:
- “टिंगल केली तरी, पाच हजार वर्षाची परंपरा सोडणार नाही”; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्यावर पुनर्रच्चार
- बुथवर वावर ठेवायला हवा, कोल्हापूरात 2 खासदार निवडून आलेच पाहिजे; जयंत पाटलांचा निर्धार
- “हनुमान चालिसाचं पठण झाल्यानंतर शिवसैनिकांकडून प्रसाद दिला जाईल”
- “शिवसैनिक माझं काही बिघडवू शकत नाही, उद्या 9 वाजता मातोश्रीवर जाणारच”
- “हनुमान चालिसा हे भाजपचे अभियान नाही”; प्रवीण दरेकाराचं स्पष्टीकरण