पुणे : पक्षाच्या संवाद यात्रेत सरकारच्या चांगल्या कामांबद्दल किंवा पक्षाच्या विचारसरणीबद्दल बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून थापा मारून आणि टिंगल टवाळी करून दिवस ढकलणे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद कराव, अशी प्रखर शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषेदमध्ये केलं.
“वळसे पाटलांवर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं”; मुनगंटीवारांचा खोचक टोला
काॅंग्रेस पक्षाने कधीच नाव बदलले नाही म्हणून जयंत पाटील अभिमानाने सांगतात. त्यांनी हे सांगावे की शरद पवारांनी 1978 मध्ये काॅंग्रेस पक्षाच्या तिकीटावर जनता पार्टीच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळवले. तो खरा काॅंग्रेस पक्ष होता की, इंदिरा गांधी यांचा काॅंग्रेस पक्ष खरा होता? शरद पवार यांचा काॅंग्रेस हा एस मुळ काॅंग्रेस पक्ष होता की, काॅंग्रेस आय हा मुळ पक्ष होता? शरद पवारांनी नंतर काॅंग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला. त्यावेळी कधीही नाव न बदलणारा मुळ काॅंग्रेस पक्ष कोणता होता? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
“सुपारी घेऊन रावणांची तोंड मुंबईत फिरायला लागलीत”; किशोरी पेडणेकरांचा राणा दाम्पत्यांना टोला
थापा मारण्याचा उच्चांक करताना जयंत पाटील म्हणाले की, भाजपचा जन्म होऊन 50 वर्ष झाली नाहीत. व त्याचवेळी त्यांनी सांगितलं की, भाजपने पन्नास वर्षात तीन वेळा नाव बदलंल आहे. काय बोलतो हे त्यांनाच समजत नाही. जनसंघाची स्थापना 1951 साली म्हणजे सत्तर वर्षापुर्वी झाली. 1975 साली देशात आणीबाणी लागू करून पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली. त्यावेळी जनसंघाने लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला व त्याचाच एक भाग म्हणून आपला पक्ष जनता पक्षात विलीन झाला असंही ते म्हणाले.
राणा दाम्पत्य गनिमी कावा करत मातोश्रीवर पोहचणार का? मुंबईत कार्यकर्त्यांचा मोठा राडा
दरम्यान, देशातील हिंदुत्वाला पाच हजार वर्षाची पंरपरा आहे आणि त्या पंरपरेचा पाईक होण्याचा भाजपला अभिमान आहे. पुण्याच्या कार्यक्रमात मी हेच सांगितलं , परंतु विषय समजून न घेता हिंदुत्वाची कुचेष्ठा करणाऱ्यांनी काहीही टिंगल केली तरी आम्ही ही पाच हजार वर्षाची परंपरा सोडणार नाही, असंही ते म्हणालेत.
Read also:
- बुथवर वावर ठेवायला हवा, कोल्हापूरात 2 खासदार निवडून आलेच पाहिजे; जयंत पाटलांचा निर्धार
- “हनुमान चालिसाचं पठण झाल्यानंतर शिवसैनिकांकडून प्रसाद दिला जाईल”
- “शिवसैनिक माझं काही बिघडवू शकत नाही, उद्या 9 वाजता मातोश्रीवर जाणारच”
- “हनुमान चालिसा हे भाजपचे अभियान नाही”; प्रवीण दरेकाराचं स्पष्टीकरण
- “ती सिनेमातील लोक, त्यांना अजून मुंबईचं पाणी माहिती नाही”; राणा दाम्पत्यांवर राऊतांची प्रतिक्रिया