मुंबई : राज्यातील संकंट दुर झाली पाहिजे, महाराष्ट्रावरील साडेसाती दुर झाली पाहिजे , यासाठी उद्या सकाळी 9 वाजता आम्ही मातोश्रीवर जाणारच असल्याचं राणा दाम्पत्यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. त्यामुळे उद्या मुंबई शिवसैनिकांची मातोश्री समोर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता राणांना शिवसैनिकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
राणा दाम्पत्य गनिमी कावा करत मातोश्रीवर पोहचणार का? मुंबईत कार्यकर्त्यांचा मोठा राडा
उद्या मातोश्री समोर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. हनुमान चालिसा संपल्यानंतर प्रसाद देण्याचं काम आम्ही करणार असल्याचं शिवसैनिकांकडून सांगण्यात आलं आहे. राणा दाम्पत्यांनी त्याचबरोबर भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. त्यामुळे मुंबईत दाखल झालेत. परंतु मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण केल्यानंतर शिवसैनिकांकडून प्रसाद दिला जाईल, असं शिवसैनिकांनी म्हटलं आहे.
राज्यातील संकंट दुर व्हावं, त्यासाठी आम्ही मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणार आहोत. ज्या हिंदुत्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेकडून मत मागत आहेत. मात्र सत्तेत आल्यानंतर ज्या सत्तेचा त्यांना लोभ आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला आहे. तो विसर जागृत करण्यासाठी आम्ही मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचणार आहोत, असं ठाम मत रवी राणा यांनी मांडलं आहे.
शिवसेनेच्या वाटेला गेलात तर.. वाघाची नखं अजूनही धारदार आहेत; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यांना इशारा
दरम्यान, आम्हाला अशा 100 धमक्या आल्या तरी आम्ही हनुमान चालिसा वाचणारच म्हणजे वाचणार. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी आम्हाला 100 वेळा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी दिली असती. मुख्यमंत्री पदावर जेव्हा उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत. तेव्हा पासून राज्यात संकंट सुरू आहे. त्यासाठीच आम्ही हे करणार आहोत. त्यासाठी आम्हाला उद्धव ठाकरे देखील थांबवू शकत नाही. तसेच शिवसैनिक माझं काही बिघडवू शकत नाही, असा दम देखील नवनीत राणा यांनी दिला आहे.
Read also:
- “शिवसैनिक माझं काही बिघडवू शकत नाही, उद्या 9 वाजता मातोश्रीवर जाणारच”
- “हनुमान चालिसा हे भाजपचे अभियान नाही”; प्रवीण दरेकाराचं स्पष्टीकरण
- “ती सिनेमातील लोक, त्यांना अजून मुंबईचं पाणी माहिती नाही”; राणा दाम्पत्यांवर राऊतांची प्रतिक्रिया
- “वळसे पाटलांवर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं”; मुनगंटीवारांचा खोचक टोला
- “सुपारी घेऊन रावणांची तोंड मुंबईत फिरायला लागलीत”; किशोरी पेडणेकरांचा राणा दाम्पत्यांना टोला