कोल्हापूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून राज्यात सध्या राष्ट्रवादी काॅंग्रेस संवाद यात्रेचे आयोजन केले जात आहे. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापुर जिल्ह्यातून आपल्याला दोन खासदार निवडून आणायचे असल्याचं आपल्या कार्यकर्त्यांना म्हटले आहे. या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष ए.व्हाय. पाटील, केडीडी संचालक संतोष पाटील, अमरसिंह चव्हाण, प्रविण वाटिगी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निहाल कलावंत, चंदगड विधानसभा अध्यक्ष रामाप्पाणा करीगार, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील, चंदगड अध्यक्ष भिकाजी गावडे, आजरा तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, वैशाली पाटील, मनिषा तेली, मुन्ना नायकवडी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
“सुपारी घेऊन रावणांची तोंड मुंबईत फिरायला लागलीत”; किशोरी पेडणेकरांचा राणा दाम्पत्यांना टोला
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, कोल्हापुर जिल्हातून यावेळी आपल्याला दोन खासदार निवडून आणायचे आहे. परंतु कोणत्याही निवडणुकीचे यश हे बुथ कमिट्यांमध्ये असते. त्यामुळे आपल्याला बुथ कमिट्यांवर लक्ष द्यायाला हवं. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी बुथ सदस्यांच्या माध्यमातून काम व्हायला हवे. बुथवर आपला वावर असेल तरच लोक आपल्या बाजूने उभे राहतील, असंही त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आहे.
राणा दाम्पत्य गनिमी कावा करत मातोश्रीवर पोहचणार का? मुंबईत कार्यकर्त्यांचा मोठा राडा
त्याचबरोबर, तुम्ही पक्ष संघटना मजबुत करा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत यश आले पाहिजे, त्यासाठी आपल्याला त्यापद्धतीची व्यवस्था करावी लागेल, अशा सुचना देखील जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना दिल्या. बाबासाहेब कुपेकर यांच्यानंतर संध्याताई कुपेकर आणि आमदार राजेश पाटील यांच्या रूपाने चंदगडच्या जनतेने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार विधानसभेत निवडून दिले. मात्र कोल्हापुर जिल्हात लोकसभेला तशी परिस्थिती नाही. एकेकाळी आपल्या विचारांचे दोन खासदार या भागातून होते. आता तेच पुन्हा दिवस आपल्याला आणायचे आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेस सवांद यात्रा चर्चेची ठरलेली आहे, कारण राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर कडाडून टिका केली होती. तसेच अमोल मिटकरी यांनी ब्राम्हण समाजाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयाबाहेर ब्राम्हण समाजाने आंदोलन केलं होतं.
Read also:
- “हनुमान चालिसाचं पठण झाल्यानंतर शिवसैनिकांकडून प्रसाद दिला जाईल”
- “शिवसैनिक माझं काही बिघडवू शकत नाही, उद्या 9 वाजता मातोश्रीवर जाणारच”
- “हनुमान चालिसा हे भाजपचे अभियान नाही”; प्रवीण दरेकाराचं स्पष्टीकरण
- “ती सिनेमातील लोक, त्यांना अजून मुंबईचं पाणी माहिती नाही”; राणा दाम्पत्यांवर राऊतांची प्रतिक्रिया
- “वळसे पाटलांवर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं”; मुनगंटीवारांचा खोचक टोला