मुंबई : राज्यात कोरोना काळात महाविकास आघाडीतील तब्बल 18 मंत्र्यांनी खाजगी रूग्णालयात उपचार घेतले. मात्र त्याची बिलं दाखवतांनी त्यांनी सरकारी बिलं सादर केली. यामध्ये आघाडीतील अनेक मंत्री असून त्यांच्यावर सध्या विरोधी पक्षांकडून जोरदार टिका केली जात आहे. याचाच धागा पकडत पत्रकार परिषदे पत्रकारांनी ज्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवारांचा पारा चांगलचा चढला.
“हनुमान चालिसा हे भाजपचे अभियान नाही”; प्रवीण दरेकाराचं स्पष्टीकरण
माहिती अधिकारामध्ये राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महसुल राज्य मंत्री अब्दुल सतार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, जलसंपदा मंत्री जंयत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब इत्यादी नेत्यांनी कोरोना काळात रूग्णालयात उपाचार घेतले होते.
“ती सिनेमातील लोक, त्यांना अजून मुंबईचं पाणी माहिती नाही”; राणा दाम्पत्यांवर राऊतांची प्रतिक्रिया
आघाडीतील या मंत्र्यांनी खाजगी रूग्णालया उपचार घेतले आणि त्यांचे बिल त्यांनी सरकारी रूग्णालयात दाखवून त्यांनी सरकारचे पैसे लाटले असल्याचं त्यात म्हटलं आहे. यातून राज्य सरकारने जवळपास उपचारापोटी 1 कोटी 39 लाख 26 हजार 720 रूपये खर्च झाले आहे. या मंत्र्यांनी खाजगी रूग्णालयात उपचार घेतल्याने सरकारी रूग्णालावर लोकांचा विश्वास कसा बसेल, असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे.
“वळसे पाटलांवर दबाव असेल तर त्यांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं”; मुनगंटीवारांचा खोचक टोला
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारण्यात आले तेव्हा. ते म्हणाले की, मी कोरोना काळात उपचार घेतावेळी स्वत:चे पैसे खर्च केलेत. आता ज्या मंत्र्यांनी त्याचा गैरफायदा घेतला त्यांना हे जाऊन विचारा, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यावेळी त्यांचा पारा चांगलाचं तापेलेला दिसून आला. कोरोना काळात लोकांचे प्रचंड हाल झाले होते. सरकारी रूग्णालयात उपचार घेण्यासाठी लोकांची मोठी रांग लागली. कोरोना काळात मंत्र्यांनी पंचतारांकित रूग्णालयात उपचार घेतले. मात्र सरकारकडे फक्त मंत्र्यांवर पैसे उधळण्यासाठी पैसे आहेत. मंत्री तुपाशी अन् जनता उपाशी, हीच का तुमची शिवशाही असा सवाल देखील भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला.
Read also:
- गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दिलासा; सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी जामीन अर्ज मंजूर
- “टिंगल केली तरी, पाच हजार वर्षाची परंपरा सोडणार नाही”; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्यावर पुनर्रच्चार
- बुथवर वावर ठेवायला हवा, कोल्हापूरात 2 खासदार निवडून आलेच पाहिजे; जयंत पाटलांचा निर्धार
- “हनुमान चालिसाचं पठण झाल्यानंतर शिवसैनिकांकडून प्रसाद दिला जाईल”
- “शिवसैनिक माझं काही बिघडवू शकत नाही, उद्या 9 वाजता मातोश्रीवर जाणारच”